
26/11 च्या हल्ल्यानंतर आर.आर. पाटील आणि विलासराव देशमुख यांचा राजीनामा घेतला गेला होता. जर तेव्हाचे राजीनामे योग्य होते, तर आज अमित शहा यांचा राजीनामा का नको?, असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांचे नाव घेत केला आहे.
.
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, शिवराज पाटील यांचा राजीनामा घेतला होता तेव्हा शरद पवार साहेब मंत्रिमंडळात होते. शिवराज पाटील यांनी बॉम्बस्फोट घडवले नव्हते ना, पण त्यांची नैतिक जबाबदारी होती. काँग्रेसने शिवराज पाटील यांचा राजीनामा घेतला होता. सरकार बरोबर म्हणजे तुम्ही सरकारच्या चुकांबरोबर आहात का? असा सवाल त्यांनी शरद पवारांचे नाव घेत केला आहे. देशाच्या सुरक्षेच्या संदर्भातसरकारने ज्या चुका केल्या आहेत त्याच्यावर कोणी बोलायचं? आम्ही सरकारच्या बरोबर आहोत. पण युद्ध तर सुरू करा. या सगळ्या गोष्टींचे सरकार राजकारण करत आहे. आधी गृहमंत्र्यांच्या राजीनामा मागा
संजय राऊत म्हणाले की, उरी, पुलवामासारख्या घटना हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे. त्यामुळे या घटनेबाबत काहीही बोलण्याचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना अधिकार नाही. घटनेनंतर त्यांनी तातडीने राजीनामा देण्याची गरज होती. देशाचा विचार करता सर्वात आधी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा होता. आता ते फक्त याला उत्तर देऊ, त्याला उत्तर देऊ, अशा घोषणा करत आहेत. आपले लष्करच आता जबरदस्त प्रत्यत्तर देईल, मात्र, तुमच्या चुकांचे फळ देश भोगत आहे. याची सत्ता पाडा, याचे आमदार, खासदार फोडा, याला, त्याला विकत घ्या, अशा कटकारस्थानात ते व्यस्त असतात. तेच त्यांचे काम आहे. त्यामुळे उरी, पुलवामा, पहलगाम येथील घटनांना देशाचे गृहमंत्री जबाबदार आहेत. अशा परिस्थितीत विरोधी पक्ष सरकारला पाठिंबा देत आहे. सरकारला पाठिंबा द्या, मात्र सर्वात आधी गृहमंत्र्यांच्या राजीनामा मागा, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
..तर वरचा नंबर आला असता
संजय राऊत म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे ते परीक्षा कधी देतात का, ते कॉपी करून सत्तेत आले आहेत. ते मेरीटवर या पदावर आले आहेत त्यामुळे त्यांचे प्रगती पुस्तक कसे असणार , त्यांनी कॉपी करण्याची संधीच मिळाली नाही. यातही कदाचित ईव्हीएम असते तर त्यांना सर्वात वरचा नंबर मिळाला असता.
गावगुंडाला पालकमंत्रीपद नको
संजय राऊत म्हणाले की, रायगडचे पालकमंत्रीपद कोणत्याही गावगुंडाला, भ्रष्टाचारी व्यक्तीला मिळू नये, राज्याच्या प्रगती पुस्तकात आदिती तटकरे यांचे चांगले काम दिसत आहे. त्यांना जिल्ह्याची चांगली माहिती आहे. राजकीय विरोध, मतभेद असले तरी त्यांचे काम चांगले आहे. त्यामुळे रायगडचे पालकमंत्रीपद योग्य व्यक्तीला मिळावे, कोणत्याही गावगुंडाकडे हेपद जाऊ नये, अशी आमची इच्छा आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.