digital products downloads

राज्यात पुढील आठवड्यात अवकाळीची चाहूल: 26 जिल्ह्यांत पाऊस, वीज आणि गारपीटीचा इशारा; शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी – Mumbai News

राज्यात पुढील आठवड्यात अवकाळीची चाहूल:  26 जिल्ह्यांत पाऊस, वीज आणि गारपीटीचा इशारा; शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी – Mumbai News


राज्यात सध्या हवामानात सातत्याने बदल होत आहेत. काही भागांमध्ये उन्हाचा तडाखा जाणवत असताना, काही ठिकाणी ढगाळ वातावरणाची स्थिती आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी राज्यातील आगामी आठवड्याच्या हवामानाचा अंदाज व्यक्त केला आह

.

ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील संपूर्ण कोकण, खान्देश, नाशिक, नगर पुणे सातारा सांगली सोलापूर, धाराशिव बीड नांदेड, गडचिरोली भंडारा गोंदिया चंद्रपूर नागपूर वर्धा अमरावती अशा 26 जिल्ह्यात उद्या शनिवार दिनांक 3 ते 10 मे पर्यंतच्या आठवड्यात ढगाळ वातावरण राहून अगदीच किरकोळ ठिकाणी एखाद्या- दुसऱ्या दिवशी वीजा, वारा व गडगडाटीचे वातावरण राहून, झालाच तर अगदीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवत आहे. या वातावरणाचा प्रभाव विदर्भातील 7 जिल्ह्यांत विशेष जाणवू शकतो, तसेच एखाद्या दुसऱ्या दिवशी किरकोळ गारपीटीचीही शक्यता नाकारता येत नसल्याचे खुळे यांनी सांगितले आहे.

हवामानात बदल का?

सध्या तरी संपूर्ण महाराष्ट्रात रात्रीचा उकाडा वा कुठेही उष्णतेच्या लाटेची शक्यता जाणवत नाही. अरबी समुद्रात सुमारे दीड किमी उंचीवर प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. हे वारे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतात आणि त्यांच्यासोबत उत्तरेकडून येणारे आर्द्र वारे 45–50 किमी प्रतितास वेगाने महाराष्ट्रात वाहत आहेत. त्यामुळेच वातावरणीय बदल होऊन राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण तयार झाल्याचे माणिकराव खुळे यांनी सांगितले. दरम्यान, शेतकऱ्यांनी विशेष असे घाबरून जाऊ नये. केवळ सावधानता बाळगावी असे खुळे म्हणाले.

राज्यात तापमानात चढ-उतार

सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये दिवसाचे तापमान 38 अंश सेल्सियस आहे. तर काही ठिकाणी विशेषतः छत्रपती संभाजीनगर, धाराशिव या जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 डिग्री पार गेल्याचे जाणवते. सदरचे तापमान जळगाव, जेऊर, सोलापूर, अकोला, अमरावती, वर्धा, ब्रम्हपुरी वगळता जवळपास सरासरी इतकेच जाणवत असून उद्या पासूनच्या आठवड्यात तापमानात 1–2 अंशांची घट होण्याची शक्यता आहे.

अकोल्यात 44.9 डिग्री तापमान, विदर्भात तीन दिवस यलो अलर्ट

दरम्यान, सलग चार दिवस ब्रम्हपुरीने उच्चांकी तापमानाची नोंद केली होती. त्या नंतर इतर शहरांचे तापमान 42 अंश सेल्सियसच्या जवळपास राहिले. शुक्रवारी अकोला येथे 44.9 अंश सेल्सियसची नोंद करण्यात आली. प्रादेशिक हवामान खात्याने विदर्भात तीन दिवस यलो अलर्ट जारी केला आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp