
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होणार आहे. आज दुपारी बारा वाजता ही बैठक होणार आहे. राज्यात रखडलेली अनेक कामे तसेच शेतकऱ्यांच्या पीक परिस्थितीचा आढावा देखील आजच्या राज्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत
.
गेल्या काही बैठकांमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी बाबत देखील आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. राज्यातील पीक परिस्थितीचा आढावा देखील आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतला जाण्याची शक्यता आहे. तसेच लाडकी बहिणी योजना आणि इतर अनेक योजनांच्या स्थितीवर देखील या बैठकीत चर्चा होईल. याबरोबरच काही महत्त्वाचे निर्णय देखील आज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मागील राज्य मंत्रिमंडळाची बैठकी चौंडी येथे झाली होती. त्यावेळी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौरा केला. दिल्लीत त्यांनी राज्यातील रखडलेल्या अनेक विकास प्रकल्पांबाबत केंद्रीय नेतृत्व आणि अधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली. त्यानंतर आजच्या होणाऱ्या बैठकीमध्ये देखील त्या संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये या संदर्भात महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चार महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या निवडणुकीत देखील महायुती एकत्र लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे त्या दृष्टीने काही निर्णय होणार का? हे पहावे लागणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.