digital products downloads

10वीत मराठी विषयात 38 हजार विद्यार्थी नापास; महाराष्ट्रात मराठी भाषाच ठरतेय अवघड

10वीत मराठी विषयात 38 हजार विद्यार्थी नापास; महाराष्ट्रात मराठी भाषाच ठरतेय अवघड

विशाल करोळे, छत्रपती संभाजीनगर, झी 24 तास : राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल लागला. निकाल चांगला लागला म्हणून सगळीकडे आनंद व्यक्त होतोय मात्र हाच निकाल आपल्यासाठी लाजिरवाणा आणि धक्कादायक आहे. ज्या महाराष्ट्राची मातृभाषा मराठी आहे, जिला अभिजात दर्जा मिळाला म्हणून सगळ्यांनी आनंद व्यक्त केला त्याच मराठीत दहावीत महाराष्ट्रातले तब्बल 38 हजार विद्यार्थी नापास झाले आहेत. 

तीन महत्त्वाचे मुद्दे 

10वीत मराठी विषयात 38 हजार विद्यार्थी नापास

इंग्रजीपेक्षाही विद्यार्थ्यांना मराठी कठीण

मराठीला अभिजात दर्जा मिळाला पण शिक्षणाचं काय?

‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ असं म्हणणाऱ्या महाराष्ट्रातले विद्यार्थी खरंच मराठी शिकतायेत का, असा प्रश्न पडलाय आणि त्याचं कारण म्हणजे नुकताच लागलेला दहावीचा निकाल. या निकालात राज्यात मराठी विषयात तब्बल 38 हजार 437  विद्यार्थी नापास झालेत. मुंबई विभागात तब्बल 4 हजार मुलं मराठीत नापास झाली आहेत तर मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये तब्बल  15 हजार 117  विद्यार्थी नापास झालेत. मराठी विषयात नापास होण्यामागे अनेक कारणं राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी सांगितली आहेत.  त्यामुळे ही स्थिती सुधारून निकाल चांगला यावा यासाठी विद्यार्थ्यांच्या मराठी विषयावर लक्ष द्यावं लागेल, असं लातूर मंडळाचे अध्यक्ष सांगत आहेत.

इंग्रजीपेक्षाही विद्यार्थ्यांना मराठी कठीण जातंय, हे दुर्दैवी आहे. इंग्रजीपेक्षा मराठी अवघड, 38 हजार 437 विद्यार्थी नापास तर इंग्रजीत 6 हजार 738 विद्यार्थी नापास झाले आहेत.  इंग्रजीच्या तुलनेत मराठी विषयांमध्ये नापास होणा-या विद्यार्थ्यांची टक्केवारी सहा पटीनं जास्त आहे. अनेक घरांमध्ये मराठीला दुय्यम मानतात, पालक मराठीत बोलत नाही परिणामी मराठी कठीण बनल्याचं भाषातज्ञ सांगतात. जागतिक भाषा इंग्रजी, पुढचं शिक्षणही इंग्रजीत मग मराठी शिकून फायदा तो काय, या विचारानं ही स्थिती असंही मत भाषातज्ञांकडून व्यक्त

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेवर भर असावा, असं धोरण असताना दुसरीकडे मात्र महाराष्ट्रातच मातृभाषेकडं दुर्लक्ष होतंय हे गंभीर चित्र आहे. मातृभाषेतून एखाद्या विषयाचं आकलन सहज होतं पण तीच येत नाही मग करायचं काय? मातृभाषेतच विद्यार्थी जर नापास होत असतील तर याला जबाबदार कोण? हे प्रश्न आहेत. मराठीचे ढोल पिटणाऱ्या राजकारण्यांनी आणि सर्व स्तरातल्या नागरिकांनी आता धोक्याची घंटा समजावी आणि मराठीकडे तातडीनं लक्ष द्यावं, अन्यथा येता काळ फार कठीण असेल. 

 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp