
कुटुंबीयांसमवेत क्रिकेट खेळताना चेंडू आणण्यासाठी गेलेल्या आठ वर्षाच्या मुलाचा पाय घसरून पडल्यानं कास धरणात ( तलावात) बुडून मृत्यू झाला. राकेश कमल विश्वकर्मा (मूळ रा. नेपाळ, सध्या रा. मंगळवार तळे, सातारा), असे दुर्दैवी मुलाचे नाव आहे. विश्वकर्मा कुटुं
.
साताऱ्यानजीकच्या कास तलाव परिसरातही पर्यटकांची गर्दी वाढत आहे. साताऱ्यातील विश्वकर्मा कुटुंबही पर्यटनासाठी कास परिसरात गेलं होतं. सर्वजण मुलांसमवेत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटत होते. क्रिकेट खेळताना चेंडू कास तलावाकडे गेला. राकेश तो चेंडू आणण्यासाठी गेल्यानंतर पाय घसरून पाण्यात पडला. पाय घसरून पाण्यात पडल्यानं बुडाला सध्या कास धरणातील पाणीसाठा घटत चालला आहे. त्यामुळं धरणानजीकची जमीन निसरडी झाली आहे.
बॉल आणण्यासाठी गेल्यानंतर राकेशचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला. त्या ठिकाणचा डोह चाळीस फूट खोल होता. त्यामुळं राकेश पाण्यात बुडाला. ही बाब लक्षात आल्यानंतर विश्वकर्मा कुटुंबानं आरडाओरड केली. पर्यटक आणि कास वन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती देऊन शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमला पाचारण केलं. रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाल्यानंतर बचाव कार्य सुरू झालं. तीन तासांच्या प्रयत्नानंतर गळाच्या साह्याने राकेशचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आलं. कोवळ्या मुलाचा मृतदेह पाहून विश्वकर्मा कुटुंबानं हंबरडा फोडला. आई-वडीलांच्या आक्रोशानं उपस्थितांचं काळीज पिळवटून गेलं. पर्यटनाला गेल्यानंतर पर्यटकांनी काळजी घ्यावी. मुलांना पाण्याजवळ जाऊ देऊ नये, असं आवाहन कास वन समिती आणि प्रशासनानं केलं आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.