
Maharashtra Weather News : राज्यात दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी करण्यात आला असून त्याचवेळी ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर येत्या दोन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार ते अती जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. मुंबईसह ठाण्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई आणि त्याच्या महानगरीय प्रदेशांमध्ये मान्सूनच्या पुनरागमनाची घोषणा केली आहे, त्यामुळे मुंबईकरांना आठवड्याच्या शेवटी वादळासह मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झाली आहे.
१४ जून रोजी मुंबईत मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह (५०-६० किमी प्रतितास) वादळाचा ऑरेंज अलर्ट आणि १५ आणि १६ जून रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ठाण्यासाठी १४ आणि १५ जून रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर रायगडसाठी १४ जून रोजी रेड अलर्ट आणि पुढील तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवडमध्येही रात्री तुफान पाऊस
पिंपरी-चिंचवडमध्येही शुक्रवारी रात्री तुफान पाऊस झाला आहे. या पावसात ओढ्यात चार ते पाच वाहनं वाहून गेली असून मुसळधार पाऊसामुळे चऱ्होलीतील ओढा ओसंडून वाहू लागला. यात रस्त्यावरील चार ते पाच वाहनं वाहत आली. अग्निशमन दलाने क्रेनच्या साह्याने ही वाहनं बाहेर काढण्यात आली. मुसळधार पावसामुळे अनेक भुयारी मार्गात पाणी साचलंय. सध्या पावसानं विश्रांती घेतली असून पावसाचा रोज वाढण्याची शक्यता आहे..
पुण्याला पुन्हा पावसानं झोडपलं
पुण्यातही शुक्रवारी संध्याकाळनंतर मुसळधार पाऊस झालाय. त्यामुळे कामावरून परतणाऱ्या पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. तुफान पाऊस झाल्यानं सखल भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. पुण्यातील धानोरी, भैरवनगर, IB रेस्ट हाऊस जलमय झाला. पावसाच्या पाण्याची ड्रेनेज लाईन बंद झाल्याने IB रेस्ट हाऊ सला तळ्याचं स्वरूप आलं. तसंच अनेक खोल्यांमधेही पाणी शिरलं.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.