
प्रहार संघटनेचे नेते तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी सत्ताधारी भाजपवर सडकून टीका केली आहे. भाजप आणीबाणीपेक्षाी वाईट वागली हे संपूर्ण देशाला माहिती आहे. हे लोक खरेच रामाचे भक्त असतील तर त्यांनी आजपर्यंत भाजपच्या कोणत्याही नेत्यावर ईडीची कारवाई का झाली
.
संसद व विधिमंडळाची अंदाज समिती ही प्रामुख्याने सरकारला काटकसरीचा सल्ला देते. पण याच समितीच्या अध्यक्ष व सदस्यांच्या 2 दिवसांच्या जेवणावर चांदीच्या थाळीचा वापर करून लाखोंचा खर्च करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. या उधळपट्टीमुळे राज्य विधिमंडळाच्या कारभाऱ्यांवर टीका केली जात असताना बच्चू कडू यांनी भाजपवर उपरोक्त शब्दांत निशाणा साधला आहे. बच्चू कडू म्हणाले, सद्यस्थितीत सरकारमध्ये अत्यंत भावनाशून्य लोक बसलेत. त्यांना कोणत्याही प्रकारच्या संवेदना नाहीत. आज राज्यात दररोज 10-15 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. रोजगार हमीच्या मजुरांना वेळेवर पगार मिळत नाही.
तुमच्यात एकही भ्रष्टाचारी नाही का?
एकीकडे पैसे नसल्याचे सांगायचे आणि दुसरीकडे अशी उधळपट्टी करायची. हे पाहून सर्वसामान्य माणसांना किती वेदना होत असतील याची कुणालाही कल्पना नाही. सत्तेवरचा अंकुश आता सुटलेला आहे. एखाद्या कसायाचे एकदा चारा खाऊ घालायचा आणि दररोज गाई-म्हशी कापायच्या याला काय अर्थ आहे? तुम्ही वेगळे काय करता? तुम्ही रामाचे खरे भक्त असाल तर सांगा भाजपच्या एकाही नेत्याची आजपर्यंत ईडीची चौकशी का झाली नाही? तुमच्यात एकही भ्रष्टाचारी नाही का? तुम्ही आणीबाणीपेक्षाही वाईट वागले हे संपूर्ण देशाला माहिती आहे, असे ते म्हणाले.
एखादी जेलवारी झाली तरी मी थांबणार नाही – कडू
बच्चू कडू यांनी आपल्याला कोणत्याही पदाची अभिलाषा नसल्याचेही यावेळी ठणकावून सांगितले. अनेकांना वाटत होते माझ्या मनात पदाची लालसा आहे. पण ते चुकीचे आहे. आमदारकी गेली किंवा अध्यक्षपद गेले म्हणजे बच्चू कडू थांबणार असे नाही. माझी एखादी जेलवारी झाली तरी मी थांबणार नाही. पण हुकूमशाही किती करावी याची काही मर्यादा आहे. अपात्र केले, यांची फाईल एक महिना कुठे दाना कात होती? अजूनही मला अपात्रतेची नोटीस मिळाली नाही. हा मला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे.
भाजपमधील काही जण आम्हाला बदनाम करत आहेत. बँक तोट्यात असल्याची आवई उठवत आहेत. संचालकांनीही बँकेची बदनामी करू नये. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करेन, कॉम्प्रमाईज होईल असे अनेकांना वाटत होते. पण असे काहीही होणार नाही. कारण माझ्या आडनावातच कडू लागले आहे, असे बच्चू कडू म्हणाले.
हे ही वाचा…
भाजपच्या नेत्याने महिला PSI चा केला विनयभंग:गर्दीचा फायदा घेत दोनदा लज्जा उत्पन्न होईल असा स्पर्श; पुण्यातील संतापजनक घटना
पुणे – पुण्यातील भाजपच्या एका नेत्याने महिला पोलिस उपनिरिक्षकाचा (PSI) विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी सदर नेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित नेत्याने आपल्यावरील आरोप फेटाळलेत. पण त्याच्यावर यापूर्वी सुद्धा असाच एक गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त करत त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. वाचा सविस्तर
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.