
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियानांतर्गत जिल्ह्यात ६२ ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानामुळे सामान्य नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थी यांना त्यांच्या गरजेचे दाखले प्राप्त झाले. अशाप्रकारे विविध महसूली सुविधाही प्रदान
.
या अभियानांतर्गत जिल्ह्याच्या १४ तालुक्यातील ९५ मंडळात ६२ शिबिरे घेण्यात आली. हे अभियान महसूल यंत्रणेकडून अधिक प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान आता मंडळ स्तरावर राबविण्यात येत आहे. सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी निकालात काढणे, तसेच महसूल प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यामध्ये सध्या समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.
गरजू नागरिकांना दाखले उपलब्ध करुन देण्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या प्रत्येक शिबिरासाठी २५ हजार रुपये इतका खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांना रहिवाशी, उत्पन्न व जातीचे दाखले, रेशन कार्ड यांचे वाटप, संजय गांधी निराधार योजना, पीएम किसान योजना आदी सामाजिक लाभाच्या योजना इत्यादींचा लाभ देण्यात येत आहे. तसेच सात-बारा वाटप, प्रलंबित फेरफार नोंदी निर्गत करणे व विविध शासकीय योजनांसाठी लागणारे दाखले अशा महसूल विभागाच्या विविध योजना आदींबाबत सुद्धा आवश्यक ते कामकाज करण्याची सुचना महसुल मंत्री बावनकुळे यांनी केली आहे.
या अभियानांतर्गत महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याच्या अनुषंगाने प्रयत्नशील राहण्याच्या सूचनाही सर्व महसुल अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात आल्या आहेत. पंतप्रधानांच्या मते छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य, सुशासनाची महान गाथा आम्हाला प्रेरणा देत आहेत. राष्ट्र कल्याण आणि लोककल्याण हे त्यांच्या शासन व्यवस्थेचे मूळ तत्व आहेत. त्याच विचाराने आम्ही राज्यात सतत काम करीत आहोत, अशी भावनादेखील महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच व्यक्त केली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.