digital products downloads

झी 24 तास Impact: ‘त्या’ शेतकऱ्याच्या मदतीला धावलं फडणवीस सरकार; कृषीमंत्री म्हणाले, ‘त्यांनी मला…’

झी 24 तास Impact: ‘त्या’ शेतकऱ्याच्या मदतीला धावलं फडणवीस सरकार; कृषीमंत्री म्हणाले, ‘त्यांनी मला…’

Zee 24 Taas Impact Latur News: नांगरटीसाठी शेतकऱ्याला बैलांचा खर्च परवडेना म्हणून बैलाऐवजी शेतकऱ्यानं स्वत:ला नांगराला जुंपल्याची घटना लातूरच्या अहमदपूर तालुक्यात घडली आहे. झी 24 तासने ही बातमी दाखवताच या बातमीची विधानसभेत चर्चा रंगली. यानंतर फडणवीस सरकार शेतकऱ्याच्या मदतीला धावलं आहे. 

दरम्यान झी 24 तासच्या बातमीचे विधानसभेतही पडदास उमटले. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित केला. हे  सरकार शेतकऱ्यांचा जीव घेणार का असा सवाल काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विचारलाय. तर सरकार शेतकऱ्यांवर पुतना मावशीचं प्रेम करत असल्याचा टोला भास्कर जाधव यांनी लगावला आहे.  

‘झी 24 तास’च्या बातमीची कृषीमंत्र्यांकडून दखल

लातूरमधील शेतकऱ्याला शेतात मशागत करण्यासाठी बैल आणि ट्रॅक्टर लावण्यासाठी पैसे नसल्यामुळे स्वत:ला औतला जुंपून शेत नांगरल्याची घटना घडली आहे. या घटनेची दखल कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी घेतली असून लातूरमधील या शेतकऱ्याने माझ्याशी संपर्क साधावा. शेतकऱ्यााला पूर्ण मदत करणार असं त्यांनी म्हटलं आहे. 

पाहा व्हिडीओ

लातूरच्या अहमदपूर तालुक्यात शेतीच्या मशागतीसाठी बैल परवडत नसल्याने एक वृद्ध शेतकरी चक्क स्वतःच औत ओढत शेतीची मशागत करताना दिसत आहे. हाडोळती येथील अल्पभूधारक शेतकरी मागच्या 50 वर्षापासून शेतीत करत आहे. मात्र आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने ट्रॅक्टरने किंवा बैलाने शेती करणे अवघड झालं आहे. त्यामुळे या पवार दाम्पत्य शेतीत कोळपणीचं काम करत आहेत. दरम्यान या वृद्ध शेतकरी दाम्पत्याचे वय 75 वर्ष आहे. मात्र,  हे  दोघेही पती-पत्नी रात्रंदिवस शेतात राबत आहेत. तरी देखील शेती परवडत नाही. यामुळे शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावे आणि राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी देखील मागणी या शेतकरी दाम्पत्यांनी केली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांवर मोठं संकट 

या वर्षी मे महिन्यापासून राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी जुलै-ऑगस्टमध्ये भरणारी धरणं ही मे महिन्यातच भरून वाहू लागली आहे. जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेताला देखील पाणी लागलं आहे. काही ठिकाणी पेरणी करणं देखील अवघड झाले आहे. शेतात पाणीच पाणी असल्यामुळे पेरणी कशी करायची असा प्रश्न आता शेतकऱ्यापुढे उभा आहे. पेरणीसोबतच बियाणे, खतं, औषधं याची चिंता आहेच.

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 25 जूनच्या अखेरीस राज्यात 39 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. ज्यामध्ये पुणे विभागातील अहिल्यानगर, पुणे आणि सोलापूरमध्ये 51 टक्के आणि अमरावती विभागातील पश्चिम विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम आणि यवतमाळ या ठिकाणी 42 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. संभाजीनगरमध्ये 37 टक्के तर नाशिक विभागात 39 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सर्वात जास्त 58 ट्क्के पेरण्या या लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोलीत झाल्या आहेत. 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp