
शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले आहे. यामुळे रस्त्याच्या साइड पट्ट्यांवर टाकण्यात आलेल्या लाल मातीमुळे पडणाऱ्या पावसात चिखल होत आहे. त्यामुळे महामार्गावर अपघात होत आहेत. रस्त्यावर चिखल येत असल्याने वाहने घसरतात अथवा माती कोरडी झाल्य
.
महामार्गालगत हॉटेल व्यावसायिकांनी आपले व्यवसाय मांडले आहेत. पाऊस झाल्यानंतर हॉटेलच्या आवारामध्ये चिखल जमा होतो. या ठिकाणाहून वाहन महामार्गावर आल्यानंतर चाकाला चिखल लागून महामार्गावर चिखल साचत असतो. या चिखलावरून वाहने घसरून अथवा माती कोरडी झाल्यानंतर वाहनाच्या वेगाने माती उडून वाहनधारकांच्या डोळ्यात जाते, यामुळे अपघाताला आमंत्रण मिळत आहे. याबाबत योग्य ती कार्यवाहीची मागणी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी जिल्हाधिकारी व प्रकल्प संचालक शिवाजी पवार यांच्याकडे केली होती. यानुसार मंगळवारी या रस्त्यावरील माती स्वच्छ करण्यात आली व हॉटेल चालकाला देखील तंबी देण्यात आली आहे. निष्काळजीपणामुळे महामार्गावर अपघात होऊन जीवितहानी झाल्यास मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू यासाठी महामार्ग प्राधिकरणाने वेळोवेळी तपासणी करणे गरजेचे आहे, असे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी सांगितले.
चिखली ते तरसोद फाट्या दरम्यान अनेक ठिकाणी अनधिकृतपणे दुभाजक तोडून रस्ते तयार करण्यात आले आहे. एका बाजूकडून हॉटेलमध्ये जात असताना अपघात होतात. याबाबत मात्र महामार्ग प्राधिकरण बघायची भूमिका घेत असून दररोज महामार्ग प्राधिकरणाची गाडी देखरेख करत असते. मात्र, ही बाब दुर्लक्षित होत असल्याने महामार्ग प्राधिकरण व हॉटेल व्यवसाय यांचे साटेलोटे तर नाही असा प्रश्न निर्माण होत आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.