
मुंबईतील वरळी येथील डोम स्टेडियमवर शनिवारी सकाळी मनसे आणि ठाकरे गटाच्या हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या ‘विजय मेळाव्या’नंतर, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि शिंदे गटाच्या शायना एनसी यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका के
.
सत्तेसाठी मराठीवर बेगडी प्रेम
या मेळाव्याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, मराठीच्या गोंडस नावाखाली आज उद्धव ठाकरे यांनी वरळीत सत्ता गेल्याचे शोकगीत गायले. पण मुख्यमंत्री असताना 2022 मध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीचा अहवाल का स्वीकारला, याचे उत्तर त्यांनी दिलेच नाही. ‘मराठी भाषा’ ही केवळ भावनांमध्ये उभी राहणारी अस्मिता नाहीतर ती धोरणात दिसली पाहिजे. पण तुम्ही मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केले. आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा मराठीवर बेगडी प्रेम करत आहात.
‘म’ म्हणजे ‘महापालिका’, ‘मराठी’ नाही
उद्धव ठाकरेंच्या भाषणातून स्पष्ट होतंय की, त्यांचा खरा अजेंडा ‘म’ म्हणजे ‘मराठी’ नाही, तर ‘म’ म्हणजे ‘महापालिका’ आहे! यांचं मराठीप्रेम म्हणजे निवडणुका जवळ आल्या की आठवण येणारी राजकीय नौटंकी आहे. जनतेने आता हा दुटप्पीपणा ओळखला आहे.
ठाकरे बंधूंचे एकत्र येणे ‘राजकीय खेळी’ – शायना एनसी
शिंदे गटाच्या प्रवक्त्या शाइना एन.सी. यांनी म्हटले आहे की, “20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले आहेत आणि त्यांना शुभेच्छा, पण ही केवळ राजकीय बतावणी आहे. उद्धव ठाकरे यांनी लढलेल्या प्रत्येक निवडणुकीत त्यांनी युती केली आहे आणि तोडली आहे. हे एका विनोदी कलाकाराचे (comedian) वैशिष्ट्य आहे. 2014 मध्ये भाजपसोबत युती होती. 2017 च्या महानगरपालिका निवडणुका आणि 2019 मध्ये पुन्हा भाजपसोबत काय झाले हे आपल्याला माहीत आहे. लोकांना फसवणूक झाल्यासारखे वाटत आहे, सत्तेसाठी ते आणि त्यांचे युतीचे भागीदार काहीही करतात. बाळासाहेब ठाकरे यांची एक विचारधारा होती, ही तर दोन अविश्वसनीय पक्षांची सोयीस्कर युती आहे, ज्याचा काहीही अर्थ नाही. सध्या ‘हम साथ साथ हैं’ असे आहे, नंतर ‘हम आपके हैं कौन’ होईल.”
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.