digital products downloads

‘फडणवीस मुख्यमंत्री असेपर्यंत…’ राज ठाकरेंची माफी मागणाऱ्या केडियांचे पुन्हा ट्वीट!

‘फडणवीस मुख्यमंत्री असेपर्यंत…’ राज ठाकरेंची माफी मागणाऱ्या केडियांचे पुन्हा ट्वीट!

Sushil Kedia: मी 30 वर्षे महाराष्ट्रात राहतो. तरी मी मराठी बोलणार नाही, असे म्हणत व्यावसायिक सुशील केडीयांनी राज ठाकरेंना खुले आव्हान दिले. यानंतर महाराष्ट्र भरातून संताप व्यक्त करण्यात आला. मनसैनिकांनी केडीयांच्या वरळीतील कार्यालयावर नारळफेक आंदोलन केले. राज्यभरातून ओढावलेला संताप पाहून सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली. यानंतर सुशील केडियांनी पुन्हा एक ट्वीट केलंय. यावेळी त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टॅग केलंय. काय म्हणाले सुशील केडिया? सविस्तर जाणून घेऊया. 

वादाला कुठून झाली सुरुवात?

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या मीरा रोड येथील दुकानदाराला मनसैनिकांनी चोप दिला. यानंतरसुशील केडिया यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, “राज ठाकरे याची नोंद घ्या की, मागील 30 वर्षांपासून मुंबईत राहत असूनही मला मराठी नीट येत नाही. आता तुमच्या अती गैरवर्तनामुळे मी निश्चित केलं आहे की, जोपर्यंत तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांची काळजी घेण्याचे नाटक करण्याची परवानगी मिळत आहे तोपर्यंत मराठी शिकणार नाही अशी मी प्रतिज्ञा करतो. काय करायचं आहे बोल?”.

केडियांच्या विधानावर राजकीय प्रतिक्रिया 

“त्यांची टोकाची भूमिका माझ्या कानावर आली आहे. त्यांनी राज ठाकरेंना जे आव्हान देण्याचा प्रयत्न केला ते मी पाहिलं आहे. महाराष्ट्रात राहून मी मराठी शिकणार नाही ही जी मस्ती वाढली आहे ती एकनाथ शिंदे, अमित शाह यांच्या राजकारणामुळे वाढली आहे. आज जो जय गुजरातचा नारा दिला त्यामुळे केडियासारख्या लोकांना बळ मिळतं. मराठीविरोधात अशी भूमिका घेती यावी यासाठीच तर अमित शाह यांनी शिवसेना फोडली, असे संजय राऊत म्हणाले होते. “महाराष्ट्रात राहून मराठी शिकण्याचा आग्रह करु शकतो दुराग्रह नाही. मी उद्या तामिळनाडूत गेल्यानंतर कोणीही मला तामिळ शिकली पाहिजे म्हणजे दुराग्रह करु शकत नाही. मला तामिळ भाषा आवडते, पण दुराग्रह करु शकत नाही. मला जर मराठीत बोलायचं असेल तर मराठीत बोलीन. पण मला जर तिथे कोणी दुराग्रह केला तर ते योग्य असेल का? आपण एका देशात भारतात राहतो. बाजूचे राज्य, भाषा काही पाकिस्तान नाही. मराठी माणूस इतकी संकुचित मनोवृत्ती ठेवू शकत नाही,” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. “महाराष्ट्रात राहून मराठीचा अपमानदेखील झाला नाही पाहिजे हे लक्षात ठेवायला हवं. महाराष्ट्रात राहताय, व्यवसाय़ करताय तर मराठीचा अपमानसहन करु शकत नाही. दोन्ही गोष्टी एकत्र चालत असता. मराठी, हिंदी विषयावर जे काही राजकारण सुरु आहे तो पाहता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कारवाई केली जाईल. कायदा हातात घेणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल,” असं योगेश कदम म्हणाले.

सुशील केडियांचा माफीनामा 

माझं ट्विट हा चुकीच्या मनस्थितीत, दबावाखाली आणि तणावाखाली झाला होता. त्यानंतर तो ट्विट लोकांकडून हाताळला गेला आणि चुकीच्या पद्धतीने व्याख्या करण्यात आली, ज्यामुळे वाद निर्माण झाला.  मराठी न जाणणाऱ्यांवर हिंसा होत असल्याने त्यांनी ओव्हररिऍक्ट केले. त्यामुळे त्यांनी त्यांचे ओव्हररिऍक्टिंग मागे घेण्याचे ठरवले, हे त्यांनी मान्य केले. 30 वर्षे मुंबईत राहूनही मला मराठी भाषेची जितकी प्रावीण्यता आणि स्पष्टता मराठी भाषिक लोकांमध्ये असते, तितकी प्राप्त होऊ शकली नाही. त्यामुळे मी मराठी भाषा फक्त अनौपचारिक वातावरणात आणि जवळच्या लोकांसोबत वापरली. भयाचे वातावरण असल्याने मराठी भाषेचा वापर करताना अनावश्यकपणे चुका होण्याची शक्यता असते, ज्यामुळे वाद निर्माण होऊ शकतो, असे ते म्हणाले. 

सुशील केडियांचे नवे ट्वीट 

जोपर्यंत महाराष्ट्राचे प्रशासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हाती आहे. तोपर्यंत निश्चिंत राहा. कोणावरही कोणत्याही प्रकारचा अत्याचार सहन केला जाणार नाही. न्याय व्यवस्था संपूर्ण सक्रीय राहील. विश्वास हाच प्रेमाचा आधार आहे. प्रेम न्यायाचा आणि न्याय धर्माचा आधार आहे. जय महाराष्ट्र, जय भारत! असे सुशील केडीयांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp