digital products downloads

‘आई, तू माझ्या जाण्यानंतर रडू नको.., ‘तिच्या’ नकारानंतर अमळनेरच्या तरुणानं संपवलं आयुष्य, Video Viral

‘आई, तू माझ्या जाण्यानंतर रडू नको.., ‘तिच्या’ नकारानंतर अमळनेरच्या तरुणानं संपवलं आयुष्य, Video Viral

Jalgaon Crime News: जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील गांधली गावात गुरुवारी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. प्रेमसंबंधातून आलेल्या धक्क्यानं एका 21 वर्षीय तरुणानं आपलं जीवन संपवलं आहे. आत्महत्या करण्याआधी या तरुणाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा भावनिक व्हिडिओ आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

गौरवचे काही महिन्यांपासून एका युवतीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र नात्यातील वाद आणि मतभेद वाढत गेले. मंगळवारी दोघांमध्ये फोनवरून जोरदार वाद झाला. हा वाद मोठा असल्यामुळे तो काही मिटला नाही. या वादाच्या काही वेळानंतर प्रियसीने गौरवसोबत लग्न करण्यास थेट नकार दिला. 

‘आई, तू माझ्या जाण्यानंतर रडू नको

या धक्क्यानं गौरव खूप खचला. त्यानंतर गौरवने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला. त्या व्हिडिओत त्याचे शब्द ऐकून डोळे पाणावतात. या व्हिडीओमध्ये गौरवने म्हटले की, ‘आई, तू माझ्या जाण्यानंतर रडू नको. मी तुझी इच्छा पूर्ण करू शकलो नाही. मित्रांनो, प्रेम करू नका, अभ्यासावर लक्ष ठेवा.

व्हिडीओ पोस्ट केल्यावर गौरवने घरातच गळफास घेतला. कुटुंबीयांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने त्याला खाली उतरवून रुग्णालयात नेलं. पण तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केलं.

पोलीस तपास सुरू

या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास अमळनेरचे पोलीस करत आहेत.  गौरवच्या मृत्यूने गांधली गावात शोककळा पसरली आहे.

सोशल मीडियावर त्याचा शेवटचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. तरुणांनी प्रेमातील अडचणींवर टोकाची पावले उचलण्याऐवजी कुटुंबीयांचा आणि मित्रांचा सल्ला घ्यावा. असा सल्ला समाजमाध्यमांवरून नागरिक देत आहेत.

FAQ

गौरवने आत्महत्या का केली?

गौरवचे एका युवतीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, नात्यातील वाद आणि मतभेद वाढल्यानंतर त्याच्या प्रियसीने लग्नास नकार दिला. या धक्क्यामुळे खचलेल्या गौरवने आत्महत्या केली.

गौरवने आत्महत्या करण्यापूर्वी काय केले?

गौरवने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक भावनिक व्हिडिओ पोस्ट केला. ज्यामध्ये त्याने आपल्या आईला रडू नको आणि मित्रांना प्रेम न करता अभ्यासावर लक्ष देण्याचा सल्ला दिला.

या घटनेतून समाजाला काय संदेश मिळतो?

प्रेमसंबंधातील अडचणींवर टोकाची पावले उचलण्याऐवजी तरुणांनी कुटुंबीयांचा आणि मित्रांचा सल्ला घ्यावा. असा संदेश समाजमाध्यमांवरून नागरिक देत आहेत.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp