
बीडला उपमुख्यमंत्री अजित पवार येऊन गेले आहेत. मात्र, ते काहीही करत नाही. अजित पवार यांचीही इतरांप्रमाणे मातीची चूल असल्याचा टोला विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी लगावला आहे. बीड आणि धाराशिव जिल्ह्यात पवन ऊर्जा बाबत शेतकऱ्यांमध्ये असंतोष असल्याचे
.
बीडमधील शेतकऱ्यांवर पवन ऊर्जा बाबत दबाव असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांचा आवाज कोणी ऐकत नसून मस्साजोग येथे घडलेली घटना सुद्धा पवन ऊर्जेतून झाली असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे. अंबादास दानवे यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.
बेस्ट निवडणूक जिंकणार असल्याचा दावा
बबिता पवार यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. बेस्ट निवडणुकीत बबिता पवार आमच्या सोबत आहे. मनसे युनियन आमच्या सोबत आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड हे दोघे मिळून लढत आहे. या निवडणुकीत आमचा विजय निश्चित होईल, असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड यांचे काम बघता यांच्यावर कारवाई होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. सत्तेचा गैरवापर होत आहे. बेस्ट निवडणूक मनसे कर्मचारी सेना आणि शिवसेना मिळून पॅनल लढेल आणि निवडणूक जिंकेल, असा दावा देखील त्यांनी केला.
सरकारला लाडक्या बहिणी नकोशा झाल्या आहेत
लाडकी बहीण योजनेची चर्चा होऊन गेली आहे. आता सरकारला लाडक्या बहिण नकोशा झाल्या आहेत. हळूहळू यातील महिलांची संख्या कमी केली जात आहे. येत्या काही दिवसांत थोड्याच लाडकी बहीण राहतील, असा दावा देखील दानवे यांनी केला आहे. लाडकी बहिण योजनेतून महिलांची नावे वगळली जात आहेत. यावरुन दानवे यांनी सरकारवर निशाणा साधला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.