digital products downloads

निवडणूक आयोगाची मंत्र्यांकडे शपथपत्र मागण्याची हिंमत आहे का?: संजय राऊत यांचा पलटवार; भाजपच्या हस्तकाप्रमाणे वागत असल्याचा आरोप – Mumbai News

निवडणूक आयोगाची मंत्र्यांकडे शपथपत्र मागण्याची हिंमत आहे का?:  संजय राऊत यांचा पलटवार; भाजपच्या हस्तकाप्रमाणे वागत असल्याचा आरोप – Mumbai News


निवडणूक आयुक्त हे भाजपच्या हस्तकाप्रमाणे वागत आहेत. ज्या भाजप पक्षासाठी ते वकिली करत आहेत, त्याच पक्षाच्या अनुराग ठाकूर आणि अन्य काही लोकांनी देखील राहुल गांधींप्रमाणेच आरोप केले असल्याचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. कोणत्या मतदार स

.

केंद्राचा मंत्री स्वतः मतदार यादीमध्ये घोटाळा झाला असल्याचे कबूल करत आहे. त्यामुळे सर्वात आधी निवडणूक आयोगाने अशा केंद्रीय मंत्र्यांकडे प्रतिज्ञापत्र मागायला हवे. राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या एकाही प्रश्नाला निवडणूक आयोगाने उत्तर दिलेले नसल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे.

निवडणूक आयोग भाजपच्या इशाऱ्यावर काम करतेय

संजय राऊत म्हणाले की, “संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने निष्पक्षता आणि सन्मानाने काम करणे अपेक्षित आहे. परंतु निवडणूक आयोगाने दाखवलेला अहंकार भाजपच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचे दिसून येते. निवडणूक आयोग राहुल गांधींकडून प्रतिज्ञापत्र मागतो, तर देशातील जनता त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास तयार असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल उपराष्ट्रपती झाले तर आम्हाला आनंद

एनडीएने महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार घोषित केले आहे. या विषयी खासदार संजय राऊत म्हणाले की, सी.पी. राधाकृष्णन हे निश्चितच महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत, एक अतिशय संतुलित व्यक्तिमत्व आहे. जर महाराष्ट्राचे राज्यपाल उपराष्ट्रपती झाले तर आम्हाला आनंद होईल, पण निवडणूक होईल. इंडिया आघाडी याचा निर्णय घेईल. तो निर्णय काय असेल? हे मी सांगू शकत नाही. पण आज आम्ही त्यावर चर्चा करू आणि निर्णय घेऊ. देशात उपराष्ट्रपती पदा पेक्षाही गंभीर मुद्दे आहेत, मत चोरीचा मुद्दा महत्त्वाचा आहे. आम्हाला त्यापासून लक्ष हटवायचे नसल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

राज्यात शेतकरी आत्महत्या तर मंत्र्यांची लंडन वारी

राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला भीक लागली आहे. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. अनेक योजना बंद पडत आहेत. अशा वेळी महाराष्ट्रातले अनेक प्रमुख मंत्री लंडनला गेलेले आहेत. राज्य वार्‍यावर सोडून, राज्यातील प्रमुख मंत्र्यांनी लंडन वारी करावी? हे आश्चर्यकारक असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. कार्यक्रम खासगी असेल किंवा सरकारी असेल. मात्र एकाच वेळी इतके मंत्री लंडन वारीला जाण्या वरुन राऊतांनी प्रश्न उपस्थित केला. महाराष्ट्र भूखा, कंगाल आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी तडफडतोय. महाराष्ट्र मध्ये अनेक प्रश्न आहेत. अशावेळी आमचे मंत्री लंडनला गेलेले आहेत, असा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp