digital products downloads

भांडूपमध्ये उघड्या वायरमुळे तरुणाचा मृत्यू: पावसात हेडफोन घालणे पडले महागात; नागरिकांनी आवाजही दिला, पण व्यर्थ – Mumbai News

भांडूपमध्ये उघड्या वायरमुळे तरुणाचा मृत्यू:  पावसात हेडफोन घालणे पडले महागात; नागरिकांनी आवाजही दिला, पण व्यर्थ – Mumbai News


मुंबईतील भांडूप परिसरामध्ये पावसात हेडफोन घालून जाणे एका तरुणाच्या जीवावर बेतले. भर पावसात विजेच्या धक्क्यामुळे एका 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. दीपक पिल्ले असे मृत तरुणाचे नाव आहे. काल दुपारी पन्नालाल कंपाऊंड परिसरात ही घटना घडली. दीपक हा पावसात ह

.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपक पिल्ले हा एल.बी.एस. मार्गावरून आपल्या घरी परतत होता. पावसामुळे परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. पन्नालाल कंपाऊंड परिसरात महावितरणची हायटेंशन वायर उघडी पडलेली होती. त्यामुळे नागरिकांनी दीपकला मोठमोठ्याने आवाज देऊन तिथून बाजुला होण्यास सांगितले. परंतु, दीपकच्या कानात हेडफोन असल्यामुळे नागरिकांचे म्हणणे त्याला ऐकू आले नाही. क्षणभरात तो त्या वायरच्या संपर्कात आला आणि विजेचा जोरदार धक्का बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

स्थानिकांनी अनेकांचे वाचवले प्राण

स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, ही वायर अनेक दिवसांपासून उघडी पडलेली होती आणि त्यामुळे धोका होताच. याआधी अनेकांना या धोकादायक ठिकाणी जाताना थांबवले होते. मात्र दीपकच्या बाबतीत त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. कारण हेडफोनमुळे दीपक त्यांचा आवाज ऐकू शकला नाही. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सुरक्षिततेची उपाययोजना करण्याची मागणी

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेतली. महावितरणच्या अधिकाऱ्यांनाही याबाबत कळवण्यात आले. पावसाळ्यात अशा उघड्या तारा जीवघेण्या ठरत असल्याने स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत. त्यांनी महावितरणवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत कायमस्वरूपी सुरक्षिततेची उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

दीपक पिल्लेच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रशासनाकडून नागरिकांना पावसाळ्यात पाणी साचलेल्या रस्त्यांवरून चालताना, विशेषतः विद्युत खांब व तारांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वेळोवेळी देखभाल करणे आवश्यक

मुंबईसारख्या महानगरामध्ये विद्युत सुरक्षेकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची बाब या घटनेतून पुन्हा एकदा समोर आली आहे. वीज वितरण कंपनी आणि महानगरपालिका यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे अशा घटना घडतात, असे तज्ज्ञ सांगतात. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन उघड्या तारा तातडीने दुरुस्त करणे, गळती तपासणे आणि वेळोवेळी देखभाल करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा अशा घटना पुन्हा घडण्याची भीती आहे.

हे ही वाचा…

अजित पवारांकडून पावसाच्या परिस्थितीचा आढावा:मोनो रेलवरून राजकारण करणाऱ्यांना सुनावले; आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे राज्यातील अनेक भागात पाणी साचले आहे. मुंबईतील परिस्थिती तर अत्यंत बिकट झाली आहे. प्रशासन आणि यंत्रणा सतर्क आहेत. मात्र, मुंबईतील नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. त्यांनी सकाळीच पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. या वेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सविस्तर वाचा…

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial