digital products downloads

‘दो बेचारे बिना…’, शिंदेंच्या शिवसेनेने ‘ती’ पोस्ट का डिलिट केली? ठाकरे बंधू होते निशाण्यावर?

‘दो बेचारे बिना…’, शिंदेंच्या शिवसेनेने ‘ती’ पोस्ट का डिलिट केली? ठाकरे बंधू होते निशाण्यावर?

बेस्टच्या (BEST) पतपेढी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालात बेस्ट युनिकनचे नेते शशांक राव यांना विजय मिळाला आहे. त्यांनी सर्वाधिक 14 जागा तर भाजपच्या 7 जागा निवडून आल्या आहेत. तर ठाकरे बंधूंच्या युतीला अपयश मिळालं आहे. 

निकाल जाहीर झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाकडून एक ट्विट करण्यात आलं आणि ते ट्विट अवघ्या काही सेकंदात डिलिट करण्यात आलं आहे. ते ट्विट नेमकं काय होतं? आणि ते का डिलिट करण्यात आलं? अशी चर्चा रंगली आहे. 

काय होतं ट्विट?

दो बेचारे- बिना सहारे
देखो पूछ-पूछ कर हारे
बिन ताले की चाभी लेकर
फिरते मारे-मारे … 

या चार ओळींमधून शिंदेंच्या शिवसेनेने ठाकरे बंधूंना ठाकरे बंधूंना डिवचलं आहे. यामध्ये त्यांनी ठाकरे बंधूंना दोन बिचारे ज्यांना कुणाचा आधार नसल्याच म्हटलं आहे. या गाण्यातून ठाकरे बंधूंना टोला लगावला आहे. 

या चार ओळी शिंदेंच्या शिवसेनेकडून ट्विट करण्यात आलं होतं. या चार ओळी Victoria No 203 या सिनेमातील गाणं आहे. कल्याणजी-आनंदजी हे या गाण्याचे संगीतकार असून गायक किशोर कुमार आणि महेंद्र कपूर आहेत. 

(हे पण वाचा – ‘ब्रँडचे बँड…’, ‘ठाकरे ब्रँड’ वरुन एकनाथ शिंदेंचा एकही जागा न जिंकलेल्या राज- उद्धव यांना टोला) 

‘ब्रँडचा बँड….’

बेस्टच्या (BEST) पतपेढी निवडणुकीत याचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ‘ब्रँडचा बँड वाजविण्याचे काम जनता करत असते. विधानसभा निवडणुकीत जनतेने आम्हाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आम्ही 80 जागा लढवून 60 जागा जिंकलो. एवढंच नव्हे तर पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की, महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही महायुती प्रचंड बहुमताने जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

माजी नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील तीन माजी नगरसेविकांनी आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. कल्याण ग्रामीणचे तालुकाप्रमुख मुकेश पाटील, तालुकाप्रमुख प्रकाश म्हात्रे, उबाठाच्या नगरसेविका सौ.प्रेमा म्हात्रे आणि नगरसेविका सौ.प्रमिला पाटील, संघर्ष समितीच्या नगरसेविका सौ.शैलजा भोईर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कोळेगावचे सरपंच लालचंद भोईर, सरपंच सुनील भोईर, गुरुनाथ जाधव यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांचा यात समावेश होता. त्यासोबतच सखाराम पाटील, गजानन मांगरुळकर, संजय गायकर, धारीवलीचे उपसरपंच रमेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य समीर पाटील, गौरव ठाकूर, छाया काळे, वारकरी सांप्रदाय अध्यक्ष सुरेश ठाकरे, उपसरपंच चंद्रकांत ठाकूर, विश्वनाथ रसाळ, हेदुटणेचे सरपंच रामदास काळण, हरिश्चंद्र मांगरुळकर यांनी देखील शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला. यावेळी आमदार राजेश मोरे, शिवसेना सचिव राम रेपाळे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, शिवसेना पदाधिकारी होते.

FAQ

बेस्ट पतपेढी निवडणूक 2025 कधी झाली?
ही निवडणूक 20 ऑगस्ट 2025 रोजी झाली.

निवडणुकीचा निकाल काय होता?
शशांक राव यांच्या पॅनेलने 14 जागा जिंकल्या, भाजपच्या प्रसाद लाड यांच्या महायुती पॅनेलने 7 जागा जिंकल्या, तर ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलला एकही जागा मिळाली नाही.

ठाकरे बंधूंच्या पॅनेलचा पराभव का झाला?
ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी या निवडणुकीकडे दुर्लक्ष केले, ज्यामुळे त्यांच्या उत्कर्ष पॅनेलला अपयश आले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp