
बेस्टच्या (BEST) पतपेढी निवडणुकीत याचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ‘ब्रँडचा बँड वाजविण्याचे काम जनता करत असते. विधानसभा निवडणुकीत जनतेने आम्हाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आम्ही 80 जागा लढवून 60 जागा जिंकलो. एवढंच नव्हे तर पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की, महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही महायुती प्रचंड बहुमताने जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
माजी नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील तीन माजी नगरसेविकांनी आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. कल्याण ग्रामीणचे तालुकाप्रमुख मुकेश पाटील, तालुकाप्रमुख प्रकाश म्हात्रे, उबाठाच्या नगरसेविका सौ.प्रेमा म्हात्रे आणि नगरसेविका सौ.प्रमिला पाटील, संघर्ष समितीच्या नगरसेविका सौ.शैलजा भोईर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कोळेगावचे सरपंच लालचंद भोईर, सरपंच सुनील भोईर, गुरुनाथ जाधव यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांचा यात समावेश होता. त्यासोबतच सखाराम पाटील, गजानन मांगरुळकर, संजय गायकर, धारीवलीचे उपसरपंच रमेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य समीर पाटील, गौरव ठाकूर, छाया काळे, वारकरी सांप्रदाय अध्यक्ष सुरेश ठाकरे, उपसरपंच चंद्रकांत ठाकूर, विश्वनाथ रसाळ, हेदुटणेचे सरपंच रामदास काळण, हरिश्चंद्र मांगरुळकर यांनी देखील शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला. यावेळी आमदार राजेश मोरे, शिवसेना सचिव राम रेपाळे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, शिवसेना पदाधिकारी होते.
ठाणे |#कल्याण – #डोंबिवली महापालिकेतील तीन माजी नगरसेविकांनी आज #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
कल्याण ग्रामीणचे तालुकाप्रमुख मुकेश पाटील, तालुकाप्रमुख प्रकाश म्हात्रे, उबाठाच्या नगरसेविका सौ.प्रेमा म्हात्रे आणि नगरसेविका सौ.प्रमिला पाटील, संघर्ष समितीच्या नगरसेविका… pic.twitter.com/xk0cAFIkRq
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 20, 2025
बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या युतीला अपयश आलं असून, बेस्ट युनियनचे नेते शशांक राव यांनी निवडणूक जिंकली आहे. त्यांनी सर्वाधिक 14 जागा तर भाजपच्या 7 जागा निवडून आल्या.
मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
या निकालानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “माझं मत होतं की, अशाप्रकारच्या निवडणुकीचं राजकीयकरण केलं जाऊ नये. ही पतपेढीची निवडणूक होती. पण त्यांनीच त्यांचं राजकीयकरण केलं,” अशी टीका त्यांनी ठाकरे बंधूंवर केली. तसेच “शशांक रावही आमचे आहेत आणि प्रसाद लाडही आमचेच आहेत. आम्ही कोणतंही राजकीयकरण केलं नाही. पण त्यांनी मात्र आता दोन ठाकरे एकत्र, ब्रँड ठाकरे निवडून येणार अशा प्रकारचं राजकीयकरण केलं. पण लोकांना ते आवडलेलं दिसत नाही. त्यामुळे त्यांना एकही जागा मिळाली नाही. या निवडणुकीत तरी त्यांना नाकारलं आहे असं चित्र आहे. पण मला याचं काही राजकीयकरण करायचं नाही”.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.