digital products downloads

पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, जालना, ठाणे, मुंबई आणि… 12 जिल्ह्यांना अलर्ट; महाराष्ट्रात भयानक पाऊस; 24 तासांत 6 जणांचा मृत्यू

पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, जालना, ठाणे, मुंबई आणि… 12 जिल्ह्यांना अलर्ट; महाराष्ट्रात भयानक पाऊस; 24 तासांत 6 जणांचा मृत्यू

Maharashtra Rains Update: काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबई आणि आसपासच्या भागात पावसाने जोरदार कमबॅक केले आहे. मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवतानाच, हवामान खात्याने (IMD) मुंबईसह महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्रात भयानक पाऊस पडत आहे.  24 तासांत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. 
विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. नांदेड आणि लातूर जिल्ह्यात परिस्थिती सर्वात जास्त बिकट झाली आहे. जिथे मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली तसेच पुणे, कोल्हापूर आणि सातारा या घाट भागात 24 तासांचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

महाराष्ट्र सरकारने 29 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, गेल्या 24 तासांत राज्यात पावसामुळे 6 जणांचा मृत्यू झाला आहे. चंद्रपूर, नांदेड, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यातून प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली आहे. याशिवाय 5 जण जखमी झाले आहेत. तर, 42  गुरेही मृत्युमुखी पडली आहेत. लातूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सामान्य जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे, त्यामुळे प्रशासनाने शुक्रवारी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. मुसळधार पावसामुळे राज्यातील मराठवाडा भागात असलेल्या लातूर जिल्ह्यातील 60 पैकी 29 महसूल मंडळांमध्ये नद्या आणि नाल्यांमध्ये पाण्याची पातळी वाढली आहे, त्यामुळे सखल भागात पाणी साचल्याने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. जवळपास 50 रस्ते आणि पूल पाण्यावरून वाहू लागल्याने बंद करण्यात आले आहेत.

राज्य महामार्ग क्रमांक 238 वरील निलंगा-उदगीर-धनेगाव रस्ता पाणी साचल्यामुळे बंद करण्यात आला आहे. मांजरा नदीवरील पूल बुडाल्याने निलंगा-उदगीर रस्ताही बंद आहे. तगरखेडा ते औराद यांना जोडणारे दोन रस्तेही पाण्यामुळे बंद झाले आहेत. निलंगा तालुक्यातील शेलगी गावात गुरुवारी मध्यरात्री वीज कोसळून पाच गुरांचा मृत्यू झाला.
दुसरीकडे, गुरुवारी संध्याकाळी चाकूर तहसीलमधील बीएसएफ कॅम्प परिसरात असलेल्या केंद्रीय विद्यालयात पाणी साचल्यामुळे अडकलेल्या 679 विद्यार्थ्यांना आणि 40 शिक्षकांना बीएसएफ जवानांनी सुरक्षितपणे बाहेर काढले. मुसळधार पावसामुळे शेजारच्या नांदेड जिल्ह्यातही परिस्थिती गंभीर आहे. तेथेही शेकडो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp