
Maharashtra Weather Update: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात पावसाचा जोर वाढला आहे. बाप्पााच्या आगमनाबरोबरच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर कायम आहेच. आज 31 ऑगस्ट रोजीदेखील मुंबईसह कोकणात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज रविवारची सुट्टी साधून अनेकजण विविध गणेश मंडळांना भेटी देतील. अशावेळी गणेशभक्तांना पावसाचा आनंदही घेता येणार आहे.
मुंबईबरोबरच मराठवाडा व विदर्भ प्रदेशातील काही भागांत हलका ते मध्यम पाऊस बरसण्याची शक्यता आहे. त्यानंतर कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज घरोघरी गौराईचे आगमन होणार आहे. काही ठिकाणी शेतातून गौर आणली जाते. गौराईच्या आगमनाला वरुण राजा हजेरी लावण्याची शक्यता आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. सोमवारनंतर मुंबईत पुन्हा पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. आत्तापर्यंत राज्यात 778.3 मिलीमीटर पाऊस झाला असून सरासरीच्या हा पाऊस 96.56 टक्के इतका आहे.
चार दिवसांपूर्वीच बंगालच्या उपसागरावर उत्तरेत आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र पश्चिमेकडे सरकल्याने मान्सूनचे वारे सक्रिय झाले आहेत. त्यांची गती वाढल्याने राज्याच्या बहुतांश भागात पाऊस झाला आहे. राज्यात पावसाने ऑगस्टपर्यंत सरासरी भरून काढली आहे.
आज पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, अकोला, अमरावती,गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पपावसाची तर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात विजांसह पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता आहे.
FAQ
राज्यात आतापर्यंत किती पाऊस झाला आहे?
आत्तापर्यंत महाराष्ट्रात 778.3 मिलीमीटर पाऊस झाला आहे, जो सरासरीच्या 96.56 टक्के आहे. ऑगस्टपर्यंत पावसाने सरासरी भरून काढली आहे.
2. पावसाचा जोर वाढण्याचे कारण काय आहे?
बंगालच्या उपसागरावर चार दिवसांपूर्वी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र पश्चिमेकडे सरकल्याने मान्सूनचे वारे सक्रिय झाले असून त्यांची गती वाढल्याने राज्यात पावसाचा जोर वाढला आहे.
3. गणेशोत्सव आणि गौराईच्या आगमनादरम्यान पावसाचा परिणाम कसा असेल?
गणेशोत्सव आणि गौराईच्या आगमनादरम्यान पावसाचा जोर कायम राहील. गणेशभक्तांना पावसाचा आनंद घेता येईल, पण मुसळधार पावसामुळे भक्तांनी खबरदारी घ्यावी. गौराईच्या आगमनावेळीही वरुण राजा हजेरी लावण्याची शक्यता आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.