digital products downloads

आझाद मैदान रिकामे करा: मुंबई पोलिसांची मराठा कोअर कमिटीला नोटीस; जरांगेंसह आदोलकांवर नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका – Mumbai News

आझाद मैदान रिकामे करा:  मुंबई पोलिसांची मराठा कोअर कमिटीला नोटीस; जरांगेंसह आदोलकांवर नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका – Mumbai News


मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मराठा कोअर कमिटीला मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. पोलिसांनी 1 सप्टेंबर रोजी आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी नाकारली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशांचे आणि आंदोलनासाठी घालून दिलेल्या अटी व शर्ती

.

मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी झालेल्या सुनावणीत मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन करणारे मनोज जरांगे यांच्यासह शहरभर विशेषतः दक्षिण मुंबईत भटकंती करणाऱ्या मराठा आंदोलकांना मुंबई ठप्प तसेच मुंबईकरांची गैरसोय करण्याचा अधिकार नाही, अशा शब्दात सुनावले आहे. तसेच परवानगीशिवाय गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर कारवाई करण्याचे देखील न्यायालयाने आदेश दिले आहेत. रस्ते, पदपाथ तसेच रेल्वे स्थानक मोकळे व स्वच्छ करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

मुंबई पोलिसांनी मराठा आरक्षण कोअर कमिटीला नोटीस बजावल्यानंतर, त्याच वेळी न्यायालयाने राज्य सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाला खारघरमध्ये परवानगी देण्याची स्पष्ट सूचना न्यायालयाने दिली असतानाही, सरकारने त्याची अंमलबजावणी का केली नाही, अशी विचारणा न्यायालयाने केली होती.

आंदोलन करण्यासाठी पोलिस आणि न्यायालयाने दिलेल्या अटी व शर्तींचे उल्लंघन झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांनी मागितलेल्या आंदोलनाच्या पुढील परवानग्या नाकारण्यात आल्या आहेत. आझाद मैदान पोलिसांनी जरांगे पाटील यांच्या कोअर कमिटीला पाठवलेल्या नोटिशीत, नियमांचे उल्लंघन झाल्याचा उल्लेख करत मैदान तात्काळ खाली करण्याचे म्हटले आहे. त्यामुळे जरांगे पाटील आता कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जरांगेंच्या कार्यकर्त्यांकडून मुंबईत गोंधळ- डावखरे

भाजपचे नेते निरंजन डावखरे म्हणाले की, मित्रांनो,जरांगे पाटील यांच्या कार्यकर्त्यांमुळे आंदोलनाच्या नावाखाली मुंबईत होणारा गोंधळ आणि धुडगूस यामुळे मराठा समाजाची प्रतिमा मलिन होत आहे.वाहतूक कोंडी, अस्वच्छता आणि सर्वसामान्यांना होणारी गैरसोय यामुळे मराठा समाजाबद्दल गैरसमज पसरू शकतात. महिला पत्रकारांची छेड काढण्यासारख्या लज्जास्पद घटनांमुळे समाजाच्या संस्कृतीलाही गालबोट लागत आहे.मनोज जरांगे पाटील यांनी शांततेत आंदोलन आवाहन केले असताना, त्यांच्या कार्यकर्त्यांनी किमान त्यांच्या आदेशाचे पालन तरी करावे, अशी पोस्ट त्यांनी केली आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp