
हिंगोली शहरासह जिल्हाभरात शनिवारी तारीख सहा रात्री साडेआठ वाजेपर्यंत 600 ठिकाणी गणेश मूर्तीचे विसर्जन पार पडले. हिंगोली शहरात पालिकेने सहा ठिकाणी उभारलेल्या अमृतकुंडामुळे गणेश भक्तांची मोठी सोय झाली.
.
हिंगोली शहरासह जिल्हाभरात यावर्षी १४९५ ठिकाणी गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. मागील दोन दिवसापासून जिल्ह्यात गणेश मूर्ती विसर्जनाची तयारी सुरू होती. तर पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांनी संवेदनशील भागाची पाहणी करून त्या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन केले होते. याशिवाय संवेदनशील भागामध्ये राज्य राखीव दलाचे जवान तैनात करण्यात आले.
दरम्यान आज दुपारपासून गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूकांना सुरवात झाली. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकरया च्या जयघोषात विसर्जन मिरवणूका सुरू झाल्या. ढोल ताशांच्या गजरात या मिरवणूका सुरू झाल्या होत्या. रात्री साडेआठ वाजेपर्यंत 1395 पैकी सहाशे ठिकाणी गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. या सर्व ठिकाणी पार पडल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान हिंगोली शहरातील गणेश मंडळांच्या सोयीसाठी पालिका मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्या पथकाने सहा ठिकाणी अमृतकलश कुंड उभारले होते. लहान गणेश मंडळांनी तसेच घरगुती गणपतीचे या सहा ठिकाणी गणेश मूर्ती विसर्जन करण्यात आले. जिल्ह्यात रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.