
Maharashtra Debt: लोकप्रिय घोषणांमुळे राज्यावर कर्जाचा बोजा झालाय. कर्जाचा बोजा 9 लाख कोटींवर जाण्याचा अंदाज. पहिल्या तिमाहीत घेतलं 24 हजार कोटींचं कर्ज. जूनअखेर 8 लाख 55 हजार कोटींवर कर्जाचा बोजा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यानंतर ठाकरेंची शिवसेना, कॉंग्रेस, पवारांची राष्ट्रवादी या विरोधी पक्षाकडून सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंनीही सरकारवर निशाणा साधलाय.
लोकप्रिय योजनांमुळे फटका?
निवडणूक काळात केलेल्या लोकोपयोगी योजनांच्या घोषणांची पूर्तता, विस्कटलेली आर्थिक घडी यामुळे राज्यावरील कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढतच चालल्याचे चित्र दिसत आहे.
कर्जाचा आकडा आणखी वाढणार?
परिणामी जून अखेरीस कर्जाचा आकडा 8 लाख 55 हजार 397 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्यातही आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच सरकारने 24 हजार कोटींचे कर्ज घेतले आहे. त्यामुळे वर्षअखेर कर्जाचा आकडा 9 लाख 32 हजार 242 कोटींवर पोहोचण्याचा अंदाज वित्त विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
‘9 लाख कोटींचं कर्ज कोणत्या योजनांमुळे?’
राज्यावर कर्जाच्या बोजावरुन संजय राऊतांनी प्रश्न उपस्थित केलाय. कर्ज घेतलेला पैसा कुणाच्या तरी खिशात असल्याचा संशय राऊतांनी व्यक्त केलाय. अनेक योजना फक्त राजकीय फायद्यासाठी असल्याची टीकादेखील त्यांनी केली. राऊत9 लाख कोटींचं कर्ज कोणत्या योजनांमुळे झालं असा सवाल खासदार संजय राऊत यांनी विचारलाय. कर्ज घेतलेला पैसा कुणाच्या तरी खिशात जातोय असा दावाही राऊतांनी केलाय. अनेक योजना फक्त राजकीय फायद्यासाठी असल्याचा आरोपही राऊतांनी केलाय.
काँग्रेसचा घणाघात
‘सरकारने खर्चाची श्वेतपत्रिका जाहीर करावी’, अशी मागणी काँग्रेस आमदार नाना पटोलेंनी केलीय. कर्जासाठी लाडक्या बहिणींना बदनाम केलं जातं असल्याचा घणाघातही त्यांनी केलाय. तर पुढील 2-3 वर्षांत राज्याला कर्जातून बाहेर काढणं अवघड असल्याची चिंता विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलीय.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
सरकारचा कारभार कर्ज काढून दिवाळी करण्याचा आहे. यातून दिवाळ निघतंय9 लाख कोटी म्हणजे नवावर किती शून्य हेदेखील मोजायला अवघड आहे. राज्यावर कर्ज येत म्हणजे राज्यातील नागरिकावर हे कर्ज येतं. हे कर्ज तुम्ही कसं फेडणार? कोण फेडणार? कर्जातून बाहेर पडून आपला विकास कधी करणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कर्ज काढून तुम्ही कॉन्ट्रक्टरच्या हितासाठी रस्ते, पूल, धरणांची काम ही काही विकासाची काम मी मानत नाही. हे कर्जबाजारीपणा कधी संपणार याकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
FAQ
प्रश्न: महाराष्ट्र राज्यावरील कर्जाचा सध्याचा आकडा किती आहे आणि वर्षअखेरीस तो किती होण्याची शक्यता आहे?
उत्तर: जूनअखेर राज्यावरील कर्जाचा बोजा ८ लाख ५५ हजार ३९७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच २४ हजार कोटींचे कर्ज घेण्यात आले असून, वर्षअखेरीस हा आकडा ९ लाख ३२ हजार २४२ कोटींवर जाण्याचा अंदाज वित्त विभागाने वर्तवला आहे.
प्रश्न: ९ लाख कोटींच्या कर्जामागे कोणत्या योजनांचा हात आहे आणि विरोधकांनी यावर काय टीका केली आहे?
उत्तर: निवडणूक काळात जाहीर केलेल्या लोकप्रिय योजनांच्या घोषणा, जसे की लाडकी बहिण योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलती इ., यांच्या पूर्ततेमुळे आणि विस्कटलेल्या आर्थिक स्थितीमुळे कर्जाचा बोजा वाढला आहे. शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (पवार गट) यांनी सरकारवर टीका केली असून, खासदार संजय राऊत यांनी कर्ज घेतलेला पैसा कुणाच्या खिशात जातोय असा संशय व्यक्त केला आणि योजना राजकीय फायद्यासाठी असल्याचा आरोप केला आहे.
प्रश्न: उद्धव ठाकरेंनी कर्जाच्या मुद्द्यावर सरकारवर काय उपरोध केला आहे?
उत्तर: उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे की, सरकारचा कारभार कर्ज काढून दिवाळी साजरा करण्याचा आहे, ज्यामुळे खरेच दिवाळेगिरी होतेय. ९ लाख कोटी म्हणजे नवावर किती शून्य हेही मोजायला अवघड आहे; हे कर्ज नागरिकांवर येतंय. कर्ज काढून रस्ते, पूल, धरणांची कामं ही कॉन्ट्रॅक्टरांच्या हितासाठी असून, खरा विकास कधी करणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.