digital products downloads

रविकांत तुपकर यांचे वादग्रस्त विधान: म्हणाले- दोन-चार मंत्र्यांना तुडवल्याशिवाय व्यवस्थेला जाग येणार नाही – Akola News

रविकांत तुपकर यांचे वादग्रस्त विधान:  म्हणाले- दोन-चार मंत्र्यांना तुडवल्याशिवाय व्यवस्थेला जाग येणार नाही – Akola News


अकोल्यातील शेतकरी संवाद सभेत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी वादग्रस्त विधान केले आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी आक्रमक पावलं उचलावी लागतील, असे तुपकर म्हणाले. सभेत भाषण करताना त्यांनी थेट इशारा देत म्हटले, नेपाळमध्ये ‘जेन-झी’ आंदोलनादरम्यान जनत

.

याचवेळी मंचावर उपस्थित असलेले भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी शेतकऱ्यांना आवाहन करताना म्हटले की, आपली जमीन हीच खरी संपत्ती आहे. ती विकू नका, कारण जमीन विकली तर पुढील पिढीचे भविष्य अंधारात जाईल.

बच्चू कडू म्हणाले- आता कलेक्टरला तोडू

या सभेत बोलताना ‘प्रहार’चे नेते बच्चू कडू यांनी त्यांच्या नुकत्याच झालेल्या जळगाव येथील आंदोलनानंतर दाखल झालेल्या गुन्ह्यांचा उल्लेख केला. जळगावातील आंदोलनात आम्ही फक्त जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट तोडलं. यानंतर राज्यात होणाऱ्या आंदोलनात आम्ही आता थेट कलेक्टरलाच तोडू, असा वादग्रस्त इशारा बच्चू कडू यांनी दिला. सभेदरम्यान, शेतकरी कर्जमाफी, पिकांना योग्य हमीभाव आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणीही करण्यात आली.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp