digital products downloads

क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेचा पूरग्रस्तांसाठी पुढाकार: शेतकऱ्यांसाठी केले मदतीचे आवाहन, म्हणाला- मी स्वतः शेतकरी कुटुंबातला असल्याने मला जाणीव – Mumbai News

क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेचा पूरग्रस्तांसाठी पुढाकार:  शेतकऱ्यांसाठी केले मदतीचे आवाहन, म्हणाला- मी स्वतः शेतकरी कुटुंबातला असल्याने मला जाणीव – Mumbai News


महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्याला अतिवृष्टीचा चांगलाच फटका बसला आहे. दुष्काळी भाग समजला जाणारा मराठवाडा पुराने वेढला गेला आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. परिस

.

क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. आता देखील त्याने एक व्हिडिओ पोस्ट करत महाराष्ट्रातील पूर परिस्थितीवर भाष्य केले असून सर्वांनाच मदतीचे आवाहन केले आहे. व्हिडिओमध्ये तो म्हणाला, गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये खूप पाऊस झाला आहे आणि या पावसामुळे शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले आहे आणि होत आहे. हे आपण सर्वांनी वाचलेच असेल. मी स्वतः एका शेतकरी कुटुंबातून असल्यामुळे मला जाणीव आहे की अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना किती त्रास होतो, असे त्याने म्हटले आहे.

शेतकरी हा आपल्या पाठीचा कणा असतो

पुढे बोलताना अजिंक्य रहाणे म्हणाला, वर्षानुवर्ष शेतकरी शेतात मेहनत करत असतो. आपल्या ताटात जे काही जेवायला मिळते ते शेतकऱ्याच्या मेहनतीमुळे. सरकार आपल्या परीने मदत करतच आहे. पण, मला असे वाटते की आपल्या प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे की आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे. आपल्याकडून जी काही मदत करता येईल ती नक्की करा. माझ्या बाजूने मी प्रयत्न करत आहे. कारण हीच वेळ आहे की आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे, कारण शेतकरी हा आपल्या पाठीचा कणा असतो, असे राहणे याने म्हटले आहे.

बाधित कुटुंबाला 10 किलो गहू-तांदूळ वितरण करण्यास सुरुवात

दरम्यान, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विभागाकडून बाधित कुटुंबाला धान्य वितरित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. राज्यातील पूरग्रस्त बाधित प्रत्येक कुटुंबाला 10 किलो गहू-तांदूळ वितरण करण्यास सुरुवात झाली असून आत्तापर्यंत 2654 कुटुंबांना मदत केली आहे. साडे सव्वीस मेट्रिक टन गहू तांदूळ दिला आहे, आमच्या विभागाकडून अन्नधान्य पुरवठा केला जातो आहे, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे. तसेच केंद्राची मदत शंभर टक्के येईल. संकट एवढे मोठे आहे की मदतीची वाट न बघता बाधित लोकांना मदत करायला सरकार पुढे येईल. पंचनामा झाल्यानंतर किती मदत द्यावी हे स्पष्ट होईल, असेही भुजबळ म्हणाले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp