
Maharashtra Weather Updates : दक्षिण भारतासह महाराष्ट्र आणि उत्तर भारतातील काही भागांमध्ये वाढलेली पावसाची तीव्रता पाहता हाच का तो परतीचा पाऊस, असाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार आतापर्यंत महाराष्ट्रात सरासरीच्या अधिक पाऊस झाला असून, पावसाचा जोर वाढून पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा जारी करण्यात आला आहे.
26 सप्टेंबरपासून राज्यात पुन्हा पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, काही भागात कमी कालावधीत अधिक पाऊस पडेल असाही सतर्कतेचा इशारा देत नागरिकांना सावध करण्यात आलं आहे. इतकंच नव्हे, तर हे अस्मानी संकट पाहता काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊन त्याचा थेट परिणाम शेतीसह जनजीवनावरही होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
पुन्हापुन्हा का वाढतोय पावसाचा जोर?
ईशान्य बंगालच्या उपसागरात हवेचं कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून, या कारणास्तव उत्तर कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा पुढं गेला याहे. याचदरम्यान पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यापाशी गुरुवारपर्यंत आणखी एका कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचा अंदाज आहे. परिणामस्वरुप महाराष्ट्रातील हवामानावर याचा परिणाम होणार असून, वारे फिरल्यानं राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Thunderstorm accompanied with lightning, light to moderate rain with gusty winds 30-40 kmph very likely to occur at isolated places in the districts of Konkan-Goa. तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया.https://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या. pic.twitter.com/MJPULemGiw
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 19, 2025
ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनीसुद्धा केंद्रीय जल आयोगाचा हवाला देत राज्यातील काही नद्या आधीच पूर परिस्थितीतून वाहत आहेत असताना 26 Sep पासून राज्यात मुसळधार- अतिमुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे, येत्या आठवड्यात सतर्क राहण्याची गरज असल्याचं स्पष्ट केलं. याशिवाय वीज पडण्याच्या आणि बहु- धोक्याच्या IMDच्या सूचना असल्यानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं.
राज्यात एकाच वेळी अतिवृष्टी अन् तापमानवाढ…
राज्यात एकिकडे अतिमुसळधार पावसाचा इशारा असतानाच मुंबई आणि नवी मुंबईत पाऊस काहीशी उसंत घेताना दिसेल. पण, अधूनमधून ढगाळ वातावरणही नाकारता येत नाही. तिथं सध्याच्या घडीला नागपूरमध्ये राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. इथं बुधवारी सर्वाधिक तापमानाची नोंद असून हा आकडा 34.2 अंशांच्या घरात होता. त्यामागोमाग अमरावतीत 33.4 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आली.
FAQ
हा सध्याचा पाऊस परतीचा पाऊस आहे का?
नाही, हा अजून परतीचा पाऊस नाही. IMD नुसार, बंगालच्या उपसागरातील नवीन कमी दाब क्षेत्रांमुळे मान्सूनची परती लांबली आहे. सुरुवातीला (12 सप्टेंबरपर्यंत) परतीचा प्रवास 15 सप्टेंबरसभोवती अपेक्षित होता, पण आता 25-28 सप्टेंबरपर्यंत पावसाच्या प्रणालींमुळे ती विलंबित होत आहे.
पुन्हापुन्हा पावसाचा जोर का वाढतोय?
ईशान्य बंगालच्या उपसागरात 22 सप्टेंबरला तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राने उत्तर कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा पसरला आहे. याचबरोबर, पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात (दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेश किनारपट्टीजवळ) 25 सप्टेंबरसभोवती आणखी एक कमी दाब क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.
शेती आणि जनजीवनावर परिणाम काय होऊ शकतो?
मुसळधार पावसामुळे काही भागांत पूरस्थिती निर्माण होऊ शकते, ज्याचा थेट फटका शेतीला (उदा. पिकांचे नुकसान) आणि वाहतूक- रस्त्यांना बसू शकतो.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



