
राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे आणि शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर, ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी पुढील सहा दिवसांसाठी, म्हणजेच दसऱ्यापर्यंत महाराष्ट्रातील हवामान कसे राहील,
.
पावसाच्या वाढीचे मुख्य कारण
जोरदार पावसाची ही शक्यता मध्य व वायव्य बंगालच्या उपसागरादरम्यान तयार झालेल्या हवामानाच्या स्थितीमुळे निर्माण झाली आहे. या भागातील हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र उद्या (शनिवारी, 27 सप्टेंबर) सकाळपर्यंत तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रुपांतरीत होण्याची शक्यता आहे. हे तीव्र कमी दाबाचे क्षेत्र चंद्रपूर, हिंगोली, पैठण, अहिल्यानगर मार्गे मुंबईच्या दिशेने पुढे सरकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या मार्गक्रमणमुळेच शनिवार, 27 सप्टेंबरपासून ते दसऱ्यापर्यंतच्या 6 दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रात पुढील काही दिवसांसाठी अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 27 सप्टेंबर रोजी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकण किनारपट्टीच्या जिल्ह्यांसह पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तसेच धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांमध्येही अतिजोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
या अतिवृष्टीचा जोर दुसऱ्या दिवशी, 28 सप्टेंबर रोजीही कायम राहील. या दिवशी मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये तसेच नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुढील दोन दिवस म्हणजेच 29 आणि 30 सप्टेंबर रोजी पावसाचा जोर प्रामुख्याने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर केंद्रित होण्याची शक्यता आहे. या काळात मुंबई, पालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्यांसह नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर अतिजोरदार पावसाची शक्यता कायम राहील. नागरिकांनी आणि प्रशासनाने या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.