digital products downloads

बाबो… 373% पाऊस! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात मोडले सर्व विक्रम; तर मराठवाड्यात…

बाबो… 373% पाऊस! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात मोडले सर्व विक्रम; तर मराठवाड्यात…

Marathwada Flood Live updates: गेल्या काही दिवसांपासून राज्यावर आस्मानी संकट कोसळलं आहे. मराठवाड्यासह विदर्भात मुसळधार पाऊस कोसळलाय त्यामुळं अनेक जिल्ह्यांना पुराने वेढलं आहे. मराठवाड्यात पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पट्ट्यात पुराने अक्षरशाः धुमाकुळ घातला आहे. गेल्या आठवड्याभरात झालेल्या पावसाने शेतकरी हवालदिल झाले आहेत. 

Add Zee News as a Preferred Source

महाराष्ट्रात कित्येत वर्षात असं घडलं नव्हतं जे गेल्या आठवड्यात घडलं आहे. गेल्या आठवड्यात मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात दुप्पट पाऊस कोसळला आहे. मराठवाड्यात 18 ते 24 सप्टेंबर या कालावधीत 42.6 मिमी पाऊस अपेक्षित असतो मात्र येथे या कालावधीत तब्बल 107.9 मिमी पाऊस पडला आहे. म्हणजेच 153 टक्के अधिक पाऊस झाला आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस हा धाराशिव जिल्ह्यात झाला असून, आठवड्याभरात तेथे 373 टक्के इतका पाऊस झाला आहे.

मध्य महाराष्ट्रात 41.7 मिमी पाऊस अपेक्षित असतो. तेथे 70.3 मिमी पाऊस झाला आहे. म्हणजेच 69 टक्के अधिक पाऊस पडला आहे. विदर्भात मात्र या कालावधीत कमी पाऊस पडला आहे. तेथे 30.4 मिमी पाऊस अपेक्षित असला तरी 22 मिमी पाऊस पडला आहे. म्हणजेच 28 टक्के पावसाची तूट आहे. संपूर्ण राज्यात 18 ते 24 सप्टेंबर या कालावधीत 42.8 मिमी पाऊस पडणे अपेक्षित असते. मात्र, 67.7 मिमी पाऊस पडला आहे. म्हणजेच संपूर्ण राज्यात 58 टक्के अधिक पाऊस नोंदवला गेला आहे.

मराठवाड्यातील पावसाची आकडेवारी

मराठवाड्यात धाराशिव जिल्ह्यात 18 ते 24 सप्टेंबर या कालावधीत सर्वाधिक पाऊस नोंदला गेला आहे. तेथे 376 टक्के अधिक पावसाची नोंद झाली. त्याखालोखाल बीड जिल्ह्यात 187 टक्के अधिक पाऊस नोंदला गेला. सोलापूर येथे 165 टक्के, अहिल्यानगर 161टक्के, छत्रपती संभाजीनगर 125 टक्के, जळगाव 108 टक्के, हिंगोली 143 टक्के, लातूर 139 टक्के, नांदेड 82 टक्के, परभणी 72 टक्के, नाशिक 89 टक्के तर धुळे येथे 50 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. धुळे वगळता इतर सर्व जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

मराठवाड्यावर अतिवृष्टीचे संकट कायम

मराठवाड्यावर अतिवृष्टीचे संकट कायम असून हवामान विभागाने शनिवारी  आणि रविवारी  या दोन दिवशी विभागातील आठही जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी केला असून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. 27 तारखेला सकाळी आठ वाजेपासूनच पावसाला सुरुवात होणार असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्याला पावसाने झोडपले असून मनुष्यहानीसह, पशुधनहानी आणि पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने चिंतेचे वातावरण आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp