
महाराष्ट्रातील मराठवाडा भागात मुसळधार पावसामुळे 11500 हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. या भागातील धाराशिव जिल्ह्यात पावसाशी संबंधित घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगरमधील हर्सूल मंडळात 24 तासांत सर्वाधिक 196 मिमी पाऊस पडला, तर वैजापूर तालुक्यातील शिवूर आणि बोरसर मंडळात 189.25 मिमी पाऊस पडला. मराठवाड्यात पूरस्थिती अतिशय भयानक आहे. अशावेळी मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मंदिरांकडून मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे.
न्यासा करणार मदत
सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून राज्यातील पुरग्रस्तांसाठी दहा कोटींच्या मदतीची घोषणा जाहीर करण्यात आली आहे. सिद्धिविनायक न्यासाचे खजिनदार पवन त्रिपाठींकडून मदतीची घोषणा जाहीर केली आहे.
काय म्हणाले खजिनदार?
#WATCH | Mumbai | Acharya Pawan Tripathi, Treasurer of Sri Siddhivinayak Temple Trust, says, “Seeing the loss being faced by farmers due to floods, and the havoc wreaked by floods throughout the state, we pray before Sri Siddhivinayak that Maharashtra comes out of this tragedy… pic.twitter.com/n3KT1674pb
— ANI (@ANI) September 29, 2025
सिद्धिविनायकसह शिर्डी आणि शेगांव संस्थांकडून देखील मुख्यमंत्री साहाय्यता निधीत देणगी जाहीर केली आहे. तसेच राज्यभरातील पूरपरस्थितीचा विचार करून साताऱ्यातील छत्रपती राजघराणे दसरा उत्सव साधेपणाने साजरा करणार आहेत. सीमोलंघन सोहळा साध्या पद्धतीने साजरा करून यावर्षीचा खर्च पूरग्रस्तांसाठी वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पूर परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला आणि प्रशासनाला मदत आणि बचाव कार्य जलद करण्याचे निर्देश दिले आणि मराठवाडा भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसात नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित केली. छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी आणि सोलापूर जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी बैठकीला उपस्थित होते.
जिल्ह्यांमध्ये परिस्थिती गंभीर
अधिकाऱ्यांनी सांगितले की, जायकवाडी धरणातून पाणी सोडल्यामुळे गोदावरी नदीतील पाण्याची पातळी वाढल्याने, विशेषतः छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये परिस्थिती गंभीर बनली आहे. सखल भागात राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. जायकवाडी धरणाचे सर्व 27 दरवाजे उघडण्यात आले आहेत. गोदावरी नदीच्या वरच्या भागात असलेल्या नाशिकमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.
हवामान खात्याकडून रेड अलर्ट
हवामान खात्याने रविवार आणि सोमवारी जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करत ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. बीड जिल्ह्यात पुराची शक्यता वर्तवण्यासाठी अधिकाऱ्यांनी ‘दवंडी’ (ढोल वाजवून विशेष घोषणा) जारी केली आहे. लष्कर आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) पथकांनाही सज्ज ठेवण्यात आले आहे.
20 सप्टेंबरपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे मराठवाडा प्रदेशाला पुराचा तडाखा बसला आहे, ज्यामुळे हजारो हेक्टरवरील पिके, घरे आणि रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे आणि सखल रस्ते आणि पूल पाण्याखाली गेले आहेत. सोलापूरमध्येही मुसळधार पाऊस झाला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.