
Mumbai Pune Missing Link Project in Final Stages : मुंबई – पुण्याला जोडणारा ‘मिसिंग लिंक’ हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे. या प्रकल्पाअंतर्गत लोणावळा तलावाच्या तळाखालून जगातील सर्वात रुंद बोगदा उभारण्यात आला आहे. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच या प्रकल्पावरील प्रकाश यंत्रणेचे आणि उर्वरित तांत्रिक काम पूर्ण करून विविध विभागांमार्फत चाचण्या घेण्यात येणार आहेत. तसेच डिसेंबरपर्यंत सर्व परवानग्या आणि प्रक्रिया पूर्ण करून नववर्षाच्या सुरुवातीलाच मिसिंग लिंक खुला करण्यात येणार आहे.
पुणे आणि मुंबई या दोन शहरांमधील अंतर कमी करण्यासाठी हा मिसिंग लिंक उभारण्यात येत आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर प्रवासाचा वेळ सुमारे 30 मिनिटांनी कमी होणार आहे. यामुले मुंबई पुणे माहामार्गावरील वाहतूकीचा तसेच प्रवास अधिक सुरक्षित आणि जलद होणार आहे. 13.3 किलोमीटर लांबीचा हा आठ मार्गिकांसह नियंत्रित प्रवेश असलेला मिसिंग लिंक एक जोड रस्ता आहे. या प्रकल्पातील भुयारी मार्ग आणि पहिला ‘व्हायाडक्ट’ मार्गांचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. लोणावळा तलावाच्या खाली बोगदा बांधण्यात आला आहे. या भुयारी मार्गात पुरेशी प्रकाश व्यवस्था, सुरक्षितता, वायुविजन, देखरेख यंत्रणा आणि आपत्कालीन, निर्गमन मार्ग यांसारख्या महत्त्वाच्या सुरक्षा तपासण्यांना सुरुवात झाली आहे.
हा मार्ग लोणावळा-खंडाळा घाटातील गर्दी आणि अपघातप्रवण भागाला वळसा घालणारा आहे. त्यामुळे प्रवासातील अंतर सुमारे सहा किलोमीटरने कमी होणार आहे. मिसिंग लिंकवर वाहने 120 KM च्या स्पीडने धावतील. मिसिंग लिंकवर दोन भुयारी मार्ग आहेत. एक 9 किलोमीटर आणि दुसरा 2 किलोमीटर लांबीचा. टायगर व्हॅली येथे 650 मीटर लांबीचा ‘केबल-स्टेड’ पूल उभारण्यात आला आहे. हा पूल जमिनीपासून 132 फूट उंचीचा आहे. तर, या मार्गावरील आणकी एक सुमारे 180 मीटर उंचीचा भारतातील सर्वांत उंच ब्रीज आहे.
FAQ
1 मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्प म्हणजे काय?
मुंबई-पुण्याला जोडणारा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. यामध्ये लोणावळा तलावाच्या तळाखालून जगातील सर्वात रुंद बोगदा बांधण्यात आला आहे. हा १३.३ किलोमीटर लांबीचा आठ मार्गिकांसह नियंत्रित प्रवेश असलेला जोड रस्ता आहे, जो पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कमी करेल आणि प्रवास अधिक सुरक्षित व जलद करेल.
2 प्रकल्पाचे सध्याचे कामकाज काय आहे?
प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. प्रकाश यंत्रणा आणि उर्वरित तांत्रिक काम लवकरच पूर्ण होईल. विविध विभागांमार्फत चाचण्या घेतल्या जाणार असून, डिसेंबरपर्यंत सर्व परवानग्या आणि प्रक्रिया पूर्ण करून नववर्षाच्या सुरुवातीलाच (जानेवारी २०२६) हा मार्ग खुला करण्यात येणार आहे.
3 हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर प्रवासावर काय परिणाम होईल?
पुणे आणि मुंबईमधील अंतर कमी होण्यासाठी हा प्रकल्प उभारला जात आहे. प्रवासाचा वेळ सुमारे ३० मिनिटांनी कमी होईल. लोणावळा-खंडाळा घाटातील गर्दी आणि अपघातप्रवण भागाला वळसा घालणारा हा मार्ग असल्याने प्रवासातील अंतर सुमारे सहा किलोमीटरने कमी होईल. वाहने १२० किमी/तास वेगाने धावतील.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.