
Indian education system in 2050: कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI येत्या काळात शिक्षण पद्धतीला पूर्णपणे नव्याने आकार देईल, असे हार्वर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ एज्युकेशनच्या तज्ज्ञांचे मत आहे. अॅस्कविथ एज्युकेशन फोरममध्ये मनोवैज्ञानिक हॉवर्ड गार्डनर आणि AI विशेषज्ञ अँथिया रॉबर्ट्स यांनी याबद्दल माहिती दिली. पुढील 30 वर्षांत AI पारंपरिक शिकण्याच्या पद्धतींना बदलून विद्यार्थ्यांना अनोखे शिकण्याचे अनुभव देईल, असे ते म्हणाले. 2050 पर्यंतचे शिक्षण पूर्णपणे वेगळे दिसेल अशी भविष्यवाणी त्यांनी यावेळी केली.
मूलभूत कौशल्यांवर केंद्रित शिक्षण
2050 पर्यंत विद्यार्थ्यांना फक्त वाचन, लेखन, गणित आणि थोडक्यात कोडिंगसारखी मूलभूत गोष्टी शाळेत शिकाव्या लागतील. यानंतर शिक्षक मार्गदर्शक किंवा प्रशिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या आवडीप्रमाणे त्यांना आव्हानात्मक अॅक्टीव्हीटी आणि व्यावसायिक संधी उपलब्ध करून देतील. पारंपरिक 10-15 वर्षांच्या शाळेला अर्थ राहणार नाही, असे मल्टिपल इंटेलिजन्स थिअरीचे जनक गार्डनर यांनी सांगितले.
क्षमता आणि मर्यादा काय?
AI मुळे अनुशासन, सर्जनशीलता आणि विश्लेषण सहज हाताळणे शक्य आहे. ज्यामुळे शिक्षणात ऐतिहासिक बदल घडणार आहे. असे असले तरी नैतिकता, आदर आणि मानवी मूल्ये AI कधीच बदलू शकत नाहीत, असे गार्डनर यांनी स्पष्ट केले. हा काळ शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठा परिवर्तन काळ म्हणून ओळखला जाईल, असे यावेळी सांगण्यात आले.
शिक्षक-विद्यार्थी भूमिकांची नव्याने व्याख्या
जसे रॉबर्ट्स स्वतः GPT, जेमिनी सारख्या मॉडेल्ससोबत संवाद साधतात तसे विद्यार्थ्यांना AI सोबत सहकार्य करायला शिकावे लागेल. ते AI ला मार्गदर्शन करतील, असे हार्वर्ड लॉ स्कूलच्या प्रोफेसर आणि ड्रॅगनफ्लाय थिंकिंगच्या संस्थापक अँथिया रॉबर्ट्स यांनी सांगितले. चॅटजीपीटी वरील 10% संभाषणे शिकवणीशी संबंधित आहेत, ज्यामुळे AI आधीच शिक्षणाचा भाग बनल्याचे प्रोफेसर मार्टिन वेस्ट यांनी नमूद केले.
मानवी मूल्य आणि संतुलन
AI ने कितीही बदल घडविले तरी आलोचनात्मक विचार, नैतिकता आणि परस्पर आदर यांसारखी मानवी गुणवत्ता कायम राहतील यावर तज्ज्ञांनी जोर दिला. रॉबर्ट्स यांनी शिक्षकांना AI च्या वापरात संतुलन राखण्याचा सल्ला दिला. यामुळे विद्यार्थ्यांच्या विचारक्षमता व शिकण्याच्या क्षमतांना बळकटी मिळेल. यामुळे फक्त काम सोपे करणार नाही. हा परिवर्तन मानवी+AI सहकार्यावर आधारित असेल, असेही ते म्हणाले.
FAQ
प्रश्न: २०५० पर्यंत AI मुळे शाळांमध्ये कोणते बदल अपेक्षित आहेत?
उत्तर: हार्वर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ एज्युकेशनच्या तज्ज्ञांनुसार, २०५० पर्यंत AI शिक्षण पद्धती पूर्णपणे बदलेल. विद्यार्थ्यांना फक्त वाचन, लेखन, गणित आणि थोडे कोडिंग शिकावे लागेल. शिक्षक मार्गदर्शक म्हणून काम करतील, तर विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे शिकण्याच्या संधी मिळतील. पारंपरिक शालेय शिक्षणाचा मॉडेल कालबाह्य होईल, आणि AI नवीन शिकण्याचे अनुभव देईल.
प्रश्न: AI शिक्षणात कोणती संज्ञानात्मक कार्ये हाताळू शकते आणि त्याच्या मर्यादा काय आहेत?
उत्तर: हॉवर्ड गार्डनर यांच्या मते, AI अनुशासन, सर्जनशीलता आणि विश्लेषणासारखी संज्ञानात्मक कार्ये सहज करू शकते, ज्यामुळे शिक्षणात ऐतिहासिक बदल घडेल. मात्र, नैतिकता, परस्पर आदर आणि मानवी मूल्ये यांना AI कधीच बदलू शकत नाही. त्यामुळे मानवी गुणवत्तांचे महत्त्व कायम राहील.
प्रश्न: शिक्षक आणि विद्यार्थ्यांना AI सोबत कसे काम करावे लागेल?
उत्तर: अँथिया रॉबर्ट्स यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना AI सोबत सहकार्य करायला शिकावे लागेल, जिथे ते AI ला मार्गदर्शन करतील. शिक्षकांनी AI चा वापर संतुलितपणे करावा, जेणेकरून विद्यार्थ्यांची आलोचनात्मक विचारक्षमता आणि शिकण्याची क्षमता वाढेल. चॅटजीपीटीवरील १०% संभाषणे शिकवणीशी संबंधित असल्याने AI आधीच शिक्षणाचा महत्त्वाचा भाग बनत आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.