
Santosh Bangar : शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे कायमच चर्चेत असतात. आजवर संतोष बांगर हे अनेक वादांमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. आता पुन्हा एकदा संतोष बांगर एका नव्या वादात अडकण्याची शक्यता आहे. पीक विमा अधिकाऱ्सोबतचा संतोष बांगर यांचा ऑडिओ कॉल सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावरून विरोधकांनी संतोष बांगर यांना कोंडीत पकडलं आहे.
हिंगोलीच्या कळमनुरीचे आमदार संतोष बांगर हे सध्या वेगळ्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. अनेकदा तर आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे संतोष बांगर अडचणीतही सापडले आहेत. अशातच आता पुन्हा एकदा शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी प्रचंड संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत पीक विमा कंपन्या काही शेतकऱ्यांना त्रास देत आहेत.
बांगरांची विमा अधिकाऱ्याला धमकी
हाच मुद्दा हेरून आमदार संतोष बांगर यांनी फोन उचलला आणि थेट पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला फोन केला. आता आमदार महोदयांची बोलण्याची पद्धत सर्वांनाच ठाऊक आहे. आमदार संतोष बांगर यांनी या अधिकाऱ्याला थेट धारेवर धरलं आणि थेट इशाराच दिला. हात पाय सलामत ठेवायचे असतील तर शेतकऱ्यांचं हित जपा असा इशाराच आमदार संतोष बांगर यांनी अधिकाऱ्याला दिला.
तर आमदार संतोष बांगर यांची ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी संतोष बांगर यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. बांगर यांनी अधिकाऱ्यांना उगाच दमदाटी करू नये. तुम्हाला शेतकऱ्यांचा कळवळा असेल तर सरकार तुमचं आहे. सरकारकडून शेतकऱ्यांचा पीकविमा मंजूर करून घ्या असं शिवसेना ठाकरे पक्षानं म्हटलं आहे.
विरोधकांना बांगरांचं प्रत्युत्तर
दरम्यान, विरोधकांच्या या टीकेनंतर आमदार संतोष बांगर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पण आपण काहीच चुकीचं बोललो नसल्याचं संतोष बांगर यांनी म्हटलं आहे. माझी ऑडिओ क्लिप ऐका त्यात काहीच चुकीचं नसल्याचा दावाही बांगर यांनी यावेळी केला आहे.
आमदार संतोष बांगर आणि वाद हे समीकरणंच आहे. आता पुन्हा एकदा अधिकाऱ्याला दमदाटी केल्यानं बांगर यांच्यावर विरोधकांनी टीकास्त्र डागलं आहे. हा वाद बाजूला ठेवून शेतकऱ्यांना पीक विमा कसा मिळणार यावर अधिक लक्ष देणं महत्त्वाचं आहे.
FAQ
संतोष बांगर कोण आहेत आणि ते का चर्चेत असतात?
संतोष बांगर हे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे शिवसेना (शिंदे गट) चे आमदार आहेत. ते बेधडक वक्तव्ये आणि वादग्रस्त कृतींमुळे नेहमी चर्चेत असतात.
ऑडिओ क्लिपमध्ये नेमके काय आहे?
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना पीक विम्याबाबत त्रास होत असल्याने संतोष बांगर यांनी विमा अधिकाऱ्याला फोन केला. त्यात त्यांनी ‘हात-पाय सलामत ठेवायचे असतील तर शेतकऱ्यांचे हित जपा’ असा इशारा दिला.
ऑडिओ क्लिप कधी व्हायरल झाली?
ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून, अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांच्या तक्रारींमुळे हा वाद उफाळून आला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.