
राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पुराच्या पाण्यात अनेकांचे घरं अक्षरशः वाहून गेली आहेत. तर अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. शेतकऱ्यांचे तर नुकसान झालेच, परंतु विद्यार्थ्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. कागद
.
चंद्रकांत पाटील म्हणाले, अनेक विद्यार्थ्यांचे साहित्य आणि शैक्षणिक साधने पुरामुळे नष्ट झाली आहेत. त्यामुळे महाविद्यालये, विद्यापीठे आणि खाजगी शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, गणवेश अशा स्वरूपात सामाजिक कर्तव्य म्हणून मदत करावी. यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल आणि त्यांचे शिक्षण अखंडितपणे सुरू राहील, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
मंत्रालयात राज्यातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणींचा आढावा घेण्यासाठी चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे. या बैठकीला उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उपसचिव प्रताप लुबाळ, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. अजय भामरे, तसेच राज्यातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, मागच्या महिन्यात बारावी बोर्ड परीक्षेचा फोरम भरण्याचा शेवटचा दिवस हा 30 सप्टेंबर होता. अंतिम तारीख पुढे ढकलण्याचे निर्देश देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार मंत्री दादा भुसे यांनी याबाबतचा निर्णय जाहीर केला होता. पुराचा फटका हा विद्यार्थ्यांना चांगलाच बसला असून विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जात असल्याचे दिसून येत आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.