digital products downloads

महाराष्ट्रात येथे उभी राहणार चौथी मुंबई, CM फडणवीसांनी मोदींसमोर केली घोषणा, नवी मुंबई विमानतळाशेजारी असेल तिसरी मुंबई

महाराष्ट्रात येथे उभी राहणार चौथी मुंबई, CM फडणवीसांनी मोदींसमोर केली घोषणा, नवी मुंबई विमानतळाशेजारी असेल तिसरी मुंबई

Devendra Fadnavis on Fourth Mumbai: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावेळी संबोधित करताना नरेंद्र मोदींचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे आपल्याला दिलेली भेट आहे असं ते म्हणाले. तसंच नवी मुंबई विमानतळाजवळ तिसरी मुंबई होईल असं सांगताना चौथ्या मुंबईसंदर्भातही मोठं विधान केलं आहे. नवी मुंबई विमानतळाजवळ तिसरी मुंबई होईल आणि वाढवणजवळ आमची चौथी मुंबई होईल असा मला विश्वास असल्याचं ते म्हणाले आहेत. 

Add Zee News as a Preferred Source

“आम्हाला प्रगतीपथावर नेल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नागरी उड्डाण मंत्रालयाचे आभार मानतो. आता आमचं लक्ष्य वाढवण बंदर आहे. मोदींनी दिलेला आम्हाला उपहार आहे. त्या ठिकाणी देशातील पहिलं ऑफशोअर विमानतळं सुरु करत आहोत. नवी मुंबई विमानतळाजवळ तिसरी मुंबई होईल आणि वाढवणजवळ आमची चौथी मुंबई होईल असा मला विश्वास आहे,” असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.

“हे विमानतळ नवं भारताचं प्रतिक आहे. या विमानतळाची संकल्पना 1990 च्या दशकातील  होती. आम्ही पुण्याहून मुंबईला जायचो तेव्हा आंतरराष्ट्रीय विमातनळ होणार असा बोर्ड पाहायचो. पण काहीच व्हायचं नाही. मोदींच्या नेतृत्वात देशात आणि महाराष्ट्रात सरकार आलं, तेव्हा आम्ही विनंती केली की प्रोजेक्टमध्ये नवी मुंबई विमानतळ घ्यावं. मोदींनी प्रगतीच्या अंतर्गत हे विमानतळ घेतल्यानंतर निर्मितीसाठी 8 एनओसी मिळत नव्हत्या. पण मोदींनी पहिली बैठक घेतली तोपर्यंत 7 एनओसी आल्याचं सचिवांनी सांगितलं. 15 व्या दिवशी आठवी एनओसी आली. जे 10 वर्षं झालं नव्हतं ते मोदींच्या एका बैठकीने झालं,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

“9 कोटी प्रवाशांना हे विमानतळ हाताळू शकतं. हे विमानतळं इंजिनिअरिंचा करिश्मा आहे. हे केवळ विमानतळ नाही तर महाराष्ट्र, भारताच्या विकासात एक महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. हे विमातनळ महाराष्ट्राचा जीडीपी 1 टक्क्याने वाढवण्याची क्षमता ठेवतो. यातून महाराष्ट्र पुढे जाणार आहे,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

“हे पहिलं विमानतळ असेल ज्याला वॉटर टॅक्सीही मिळणार आहे. म्हणजे येथील वॉटर टॅक्सीत बसून थेट गेट वे ऑफ इंडियाला जाता येईल. कोणतंही ट्राफिक लागणार नाही. अशी व्यवस्था विमानतळावर करण्यात आली आहे,” अशी माहितीही त्यांनी दिली. 

 

FAQ

1) विमानतळाच्या बांधकामासाठी किती खर्च झाला?
पहिल्या टप्प्यासाठी सुमारे १९,६५० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. हे विमानतळ हेथ्रो (लंडन) आणि इंचियोन (दक्षिण कोरिया) सारख्या आंतरराष्ट्रीय विमानतळांसोबत स्पर्धा करण्यासाठी तयार केले गेले आहे.प्रश्न 

2) विमानतळाची क्षमता आणि विस्तार योजना काय?
पहिल्या टप्प्यात (२०२५) टर्मिनल १ मधून २० दशलक्ष प्रवाशांची क्षमता असेल. दुसऱ्या टप्प्यात (२०२९) टर्मिनल २ मधून ३० दशलक्ष प्रवाशांची क्षमता वाढेल. एकूण १०० दशलक्ष प्रवाशांची क्षमता असलेला हा विमानतळ मुंबईच्या दुसरा आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल.

3) विमानतळाची खास वैशिष्ट्ये काय आहेत?
हा भारतातील पहिला पूर्णपणे डिजिटल विमानतळ आहे, ज्यात चिंतामुक्त प्रवासासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. तसेच, तो पर्यावरणस्नेही आहे आणि भविष्यातील हवाई वाहतुकीसाठी एक गेटवे म्हणून विकसित केला गेला आहे. मुंबईतील भूमिगत मेट्रो आणि इतर कनेक्टिव्हिटीमुळे प्रवास सोयीचा होईल.

 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp