digital products downloads

हिंगोली-कळमनुरी महामार्गावर बेफिकीरी: फेकून दिलेले साहित्य बनले अपघाताचे कारण, महामार्ग विभागाच्या दुर्लक्षाने मोठ्या अपघाताची भिती – Hingoli News

हिंगोली-कळमनुरी महामार्गावर बेफिकीरी:  फेकून दिलेले साहित्य बनले अपघाताचे कारण, महामार्ग विभागाच्या दुर्लक्षाने मोठ्या अपघाताची भिती – Hingoli News


हिंगोली ते कळमनुरी राष्ट्रीय महामार्गावर दुरुस्तीचे काम सुरु नसतांनाही त्या ठिकाणी सुचना फलकाचे साहित्य अस्ताव्यस्त फेकून दिले असून त्यामुळे मोठा अपघातात होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. या प्रकाराकडे राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचे साफ दुर्लक्ष होत

.

राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून वाशीम ते वारंगाफाटा या सुमारे १०० किलो मिटर अंतराच्या रस्त्याचे बांधकाम केले आहे. काही ठिकाणी सिमेंट तर काही ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले असून मागील दोन वर्षापासून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र रस्ता खुला झाल्यानंतर काही दिवसांत रस्त्यांवर भेगा पडू लागल्या असून काही ठिकाणी पुलाच्या रस्त्याचा जोड वरखाली झाल्यामुळे वाहने आदळत आहेत.

दरम्यान, याबाबत वारंवार झालेल्या तक्रारीनंतर राष्ट्रीय महामार्ग पथकाने संबंधित कंत्राटदाराकडे पाठपुरावा करून रस्त्याच्या भेगा भरून घेतल्या तर पुलाच्या ठिकाणी असलेल्या रस्त्याच्या जोड डांबरीकरणाने भरून घेतला आहे. मात्र त्यानंतरही या रस्त्याची दुरावस्था कायम आहे.

दरम्यान, संबंधित कंत्राटदारांकडून या मार्गावर दुरुस्तीचे काम केले जात नसतानाही खानापूरचित्ता ते उमराफाटा या मार्गावर रस्त्याच्या मधोमध सुचना फलकाचे साहित्य अस्ताव्यस्त टाकून दिले आहे. त्यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या वाहनांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या साहित्यामुळे किरकोळ अपघात होत असतांना त्याकडे राष्ट्रीय महामार्ग पथक व कंत्राटदारांकडून दुर्लक्ष केले जात असल्यामुळे वाहन चालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. रस्ता बांधकाम नाही अन दुरुस्तीची नसतांना साहित्य रस्त्यावर टाकले कशासाठी असा सवाल उपस्थित केला जात आहे.

हे ही वाचा…

हिंगोली जिल्ह्याची सरासरी नजरी पैसेवारी 45.88 पैसे:सर्वात कमी कळमनुरी तालुक्यात 43.96 पैसे, अतिवृष्टीमुळे पिकांना फटका बसल्याचे स्पष्ट

हिंगोली जिल्ह्याची नजरी पैसेवारी सरासरी 45.88 पैसे जाहिर झाली आहे. यामध्ये सर्वात कमी पैसेवारी कळमनुरी तालुक्यात 43.96 पैसे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पिकांना अतिवृष्टीचा फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे. आता अंतिम पैसे वारीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. सविस्तर वाचा…

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial