
Maharashtra Weather News : महाराष्ट्रातून मान्सूननं (Monsoon) काढता पाय घेतला अशी माहिती हवामान विभागानं जारी केली असली तरीही वाऱ्यांची एकंदर स्थिती पाहता घोंगावणाऱ्या झंझावातासह दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची हजेरी असेल अशी माहिती हवामान विभागाच्या मुंबई शाखेनं जारी केली आहे. यादरम्यान कोकणातही काही भागांसह मध्य महाराष्ट्रातही आकाश अंशत: ढगाळ राहणार असून, काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्र मात्र (October heat) ‘ऑक्टोबर हिट’ मुळं होरपळून निघणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये तापमानाच लक्षणीय वाढ झाली असून, दुपारच्या वेळी हे तापमान अधित त्रासदायक ठरत असल्यानं नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात येत आहे.
नैऋत्य मान्सूनची महाराष्ट्रातून माघार
नैऋत्य मान्सूनची महाराष्ट्रातून माघार घेतल्याची आयएमडीची माहिती असून, पुणे IMD ने नैऋत्य मान्सून महाराष्ट्र आणि गोव्यातून माघारी फिरल्याचे जाहीर केलं आहे. गडचिरोलीचा काही भाग वगळता राज्यात गेल्या तीन दिवसांपासून कोरडं हवामान होतं. मान्सूनची माघार सर्वसाधारण वेळेतच झाली आहे. परतीच्या मान्सूनची दक्षिण सीमा सध्या कारवार, कलबुर्गी, निजामाबाद आणि गुवाहाटीपर्यंत पोहोचली आहे. ज्यामुळं पुढच्या 48 तासांमध्ये देशाच्या उर्वरित भागातूनही मान्सून माघारी जाण्याचा अंदाज आहे. ज्यामुळं आता मान्सूनचा यंदाचा हंगाम राज्यात 141 दिवसांचा राहिल्याचं स्पष्ट होत आहे.
पुढील 24 तासांसाठी काय अंदाज?
राज्यात प्रामुख्यानं रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र, सातारा, सांगली, कोल्हापूर, अकोला, अमरावती इथं पावसाची हजेरी असू शकते असा प्राथमिक अंदाज आहे. तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार सध्या अरबी समुद्राच्या मध्य पश्चिमेला चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण धाली असून, त्याचा परिणाम लक्षद्वीप, केरळ आणि कर्नाटकाच्या किनारपट्टी भागावर दिसून येणार आहे, जिथं या आठवड्यात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन महाराष्ट्रातही पावसासाठी पोषक वातावरणनिर्मिती होताना दिसेल.
देशभरातील हवामानाचा वेगवान आढावा…
देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शीतलहरींची उपस्थिती पाहता उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीरमधील पर्वतीय भागांमध्ये तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. तर, या गारठ्याचा परिणाम उत्तर प्रदेश, राजस्थानसारख्या मैदानी राज्यांमध्येसुद्धा दिसून येत आहे.
खासगी हवामान संस्था स्कायमेटच्या अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये दक्षिण भारतातील काही किनारपट्टी क्षेत्रांमध्ये पावसाची हजेरी असेल. यामध्ये ओडिशा, आंध्रचा किनारा, तेलंगणा, केरळ, तामिळनाडू, अंदमान निकोबार बेट समुह यांचा समावेश आहे.
FAQ
नैऋत्य मान्सून महाराष्ट्रातून माघार घेतली आहे का?
होय, भारतीय हवामान विभाग (IMD) पुणे शाखेनुसार, नैऋत्य मान्सूनने महाराष्ट्र आणि गोव्यातून माघार घेतली आहे. गडचिरोलीचा काही भाग वगळता राज्यात गेल्या तीन दिवसांपासून कोरडे हवामान आहे.
यंदा मान्सूनचा हंगाम किती दिवसांचा राहिला?
महाराष्ट्रात यंदा मान्सूनचा हंगाम 141 दिवसांचा राहिला आहे. पुढील 48 तासांमध्ये देशाच्या उर्वरित भागातूनही मान्सून माघारी जाण्याचा अंदाज आहे.
पुढील 24 तासांत महाराष्ट्रात कुठे पाऊस पडेल?
राज्यात प्रामुख्याने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र (सातारा, सांगली, कोल्हापूर), अकोला आणि अमरावती भागात पावसाची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात घोंगावणाऱ्या झंझावातासह पाऊस होऊ शकतो.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.