digital products downloads

गडचिरोलीत नक्षलवाद्यांचं समर्पण ते 3 लाख कोटींची गुंतवणूक; ‘रेड झोन’ मध्ये जाऊन CM फडणवीस काय म्हणाले?

गडचिरोलीत नक्षलवाद्यांचं समर्पण ते 3 लाख कोटींची गुंतवणूक; ‘रेड झोन’ मध्ये जाऊन CM फडणवीस काय म्हणाले?

CM Devendra Fadnavis on Gadchiroli Naxal bhupati Surrender : महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीनं आणि प्रामुख्यानं विदर्भाच्या विकासाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची अशी घडामोड साऱ्या देशाचं लक्ष वेधून गेली. जिथं गडचिरोलीत नक्षलवादी भूपतीसह 60 नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिसांना शरण जाण्याचा निर्मय घेतला आणि (CM Devendra Fadnavis) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. 

Add Zee News as a Preferred Source

आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांना मुख्यमंत्र्यांनी संविधानाची प्रत भेट दिली. मागील 45 वर्षांपासूनच्या गडचिरोली भागात भूपतीची दहशत होती. ही दहशत आता संपुष्टा येत असून,  भूपतीच्या आत्मसमर्पणामुळे गडचिरोली भयमुक्त होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे असं मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं.  

पोलिसांसाठी एक कोटीचा पुरस्कार जाहीर 

नक्षलवाद्यांना शरण आणून देण्याच्या रणनितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या गडचिरोली पोलिसांसाठी मुख्यमंत्र्यांनी एक कोटीचा पुरस्कार जाहीर केला. यावेळी ‘गडचिरोलीतला माओवाद समाप्तीचा चॅप्टर सुरु झालाय’ हे त्यांचं वक्तव्य चर्चेत राहिलं. ’40 वर्षापासून गडचिरोली माओवाद विरुद्ध लढा सुरु होता. ही व्याप्ती सुरुवातीला चंद्रपूर, गोंदियापर्यंतही होती. इथं कोंडापल्ली सितारामया यांनी पिपल्स ग्रुप तयार केला. त्यानंतर अनेक तरुणांमध्ये विष पेरले गेले आणि ते व्यवस्थेविरुद्ध उभे राहिले. सोनू उर्फ भूपतीनं आत्मसमर्पण  केले’, असं ते म्हणाले.  

भूपतीनं ओवादी म्होरक्या म्हणून मोठे संख्यने  नक्षलवादी एकत्र केले, मात्र 2014 मध्ये मोदी  आले आणि दुहेरी योजना आखण्यात आली ही बाब लक्षात आणून देत माओवाद नष्ट करण्यासाठी गृहमंत्री शहा यांनीही रणनीती आखल्याचं फडणवीस म्हणाले. 

सदर प्रसंगी गडचिरोली पोलीस आणि C-60 जवानाचं मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलं. नक्षलवाद्यांनी शरण येण्याचा हा दिवस म्हणजे नवीन इतिहास असल्याचं म्हणत ज्यानं चळवळ उभी केली त्याने शरण येणं आणि अनेक नक्षलवाद्यांना शरण व्हायला तयार करणं ही देशाच्या इतिहासातील मोठी घटना असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. 

‘रेड झोन लवकर मुक्त होईल’

‘उत्तर गडचिरोली आपण मुक्त केलाय. आता दक्षिण गडचिरोली लवकर पूर्ण मुक्त होइल. काही मोजके नक्षलवादी राहिले आहे. त्यांनी सरेंडर करावं नाहीतर त्यांना कारवाईला समोरं जावं लागेल’, असा इशारा देत ‘रेड झोन’ लवकर मुक्त होईल हा निर्धार फडणवीसांनी व्यक्त केला. हा अभिमान आणि स्वाभिमानाचा क्षण असल्याचं सांगत त्यांनी आत्मसमर्पण  करणाऱ्याचे  उत्तम पुनर्वसन करू अशंस आश्वासन देत त्यांना लॉयेड्स स्टीलला त्यांना नोकरी देऊ असे कंपनीने सांगितल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. 

3 लाख कोटीची गुंतवणूक… 

गडचिरोली-चंद्रपूरसाठी 3 लाख कोटीची गुंतवणूक आली असून गुंतवणूक करणाऱ्यांना या भागात 95  टक्के  भुमिपुत्रांना रोजगार दिला जाणार असल्याच्या सूचना दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. गडचिरोलीतील वस्तुस्थितीबाबत सांगताना इथं लोक पोस्टिंग मागत आहे, ज्यामुळं येत्या काळात हा महाराष्ट्राचा पहिला जिल्हा असेल असं म्हणत एक आशेचा दृष्टीकोन त्यांनी दाखवला. 

नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं असलं तरीही पोलिसांनी पुढील 3 वर्ष शिथिल होता कामा नये, असं आवाहन करत त्यांना सजग राहायला हवं अशा शब्दांत त्यांनी पोलिसांनाही सतर्कतेचा इशारा दिला. 

आत्मसमर्पण केलेल्या दहशतवाद्यांची नावं… 

1)सावी कुमरेटी, सदस्य
2) शर्मिला मडकामे, सदस्य
3) भीमा सौदी, सदस्य
4) अमोल सौदी, सदस्य , तांत्रिक गडचिरोली
5) मंजू कोवाची, acm गडचिरोली
6) कोसा कोवासे, 
7) प्रियंका लेकामी, उपकामंडर
8) रोशनी कुरचामी, tech
9) मधू टेकाम, tech
10) सुरेश तलांडे
11) निर्मला तालामी
12) सुनील कुंजाम, 
13) सागर सिडाम, DVCM tech
14) मैनू गावडे, AK 47
15) शब्बीर उर्फ अर्जुन AK 47
16) निखिल लेकामी DVCM 10 कंपनी
17) कलमसाय वेलादी
18) स्वाती , उर्फ लता
19) विवेक उर्फ भास्कर
20) भूपती आणि इतर 40 दहशतवाद्यांचाही समावेश…. 

FAQ

गडचिरोलीत कोणत्या नक्षल नेत्याने आत्मसमर्पण केले आणि त्याची पार्श्वभूमी काय?
मल्लोजुला वेणुगोपाल राव उर्फ भूपती (सोनू) या वरिष्ठ नक्षल नेत्याने आत्मसमर्पण केले. त्याच्यावर ₹6 कोटींची शिक्षा होती आणि तो 45 वर्षांपासून गडचिरोली भागात दहशत पसरवत होता. 

आत्मसमर्पण करणाऱ्यांना CM ने काय भेट दिली?
मुख्यमंत्र्यांनी शरणागत नक्षलवादींना संविधानाची प्रत भेट दिली. तसेच, त्यांचे उत्तम पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले. लॉयड्स स्टील कंपनीने शरणागतांना नोकरी देण्याची घोषणा केली आहे.

नक्षलवाद नष्ट करण्याच्या रणनीतीबद्दल CM ने काय सांगितले?
2014 मध्ये मोदी सरकार आल्यानंतर दुहेरी योजना आखली गेली आणि गृहमंत्री अमित शहा यांनी माओवाद नष्ट करण्याची रणनीती आखली, असे फडणवीस म्हणाले. यामुळे माओवादाची व्याप्ती चंद्रपूर, गोंदियापर्यंतून कमी झाली. उत्तर गडचिरोली मुक्त झाला असून, दक्षिण गडचिरोली लवकर मुक्त होईल; उरलेल्या मोजक्या नक्षलवादींनी शरण यावे अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp