
महाराष्ट्राच्या राजकारणासाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गेल्या काही दिवसांतील आज सातवी भेट झाली. मनसेच्या वतीने दादरच्या शिवाजी पार्क मैदानात आयोजित करण्यात आलेल्या
.
संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उद्धव ठाकरे हे कुटुंबासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ बंगल्यावर दाखल झाले. उद्धव ठाकरे यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा तेजस ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते. ठाकरे कुटुंबीयांच्या या भेटीगाठीनंतर तासाभराने ठाकरे बंधू कुटुंबीयांसह शिवाजी पार्कच्या दिशेने रवाना झाले.
या दीपोत्सव कार्यक्रमात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काय बोलणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मात्र, या कार्यक्रमात राजकीय भाष्य टाळण्यात आले.
कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या वेळी मनसेकडून उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबियांचे आणि पक्षाच्या प्रमुख नेत्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर उद्धव ठाकरे यांनी केवळ दोन-तीन वाक्ये बोलून आपले मनोगत व्यक्त केले आणि ते मंचावरून माघारी परतले. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
उद्धव ठाकरे यांचे मनोगत
“उपस्थित सर्व बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा! आजची दिवाळी ही वेगळी आहे आणि विशेष आहे. मला खात्री आहे की, मराठी माणसाची एकजूट आणि त्या एकजुटीचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात आनंद घेऊन आल्याशिवाय राहणार नाही. असेच सर्वजण आनंदात, प्रकाशात राहा. सर्वांना आनंद देत राहा. परत एकदा शुभेच्छा देतो. जय हिंद. जय महाराष्ट्र,” असे अत्यंत छोटेखानी भाषण उद्धव ठाकरे यांनी केले. राज ठाकरे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले नाही. दिवाळी असल्यामुळे ठाकरे बंधूंनी सलोख्याचे वातावरण ठेवत राजकीय चर्चा टाळल्याचे बघायला मिळाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.