
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बीडमधील महाएल्गार सभेत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर तिखट टीका केली होती. विखे आला आणि सर्व महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला. गेला तर गेला पण जीआर काढला, असे भुजबळ म्हणाले होते. आता य
.
मराठा आरक्षणाच्या जीआर विरोधात बीडमध्ये शुक्रवारी ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात छगन भुजबळ यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. विखे पाटील गरज नसताना मनोज जरांगे-पाटील यांच्याकडे वारंवार भेटीगाठीसाठी जातात. जरांगे-पाटील यांच्याशी वारंवार भेटणाऱ्या विखेंना सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी भाजप नेत्यांना दिला होता.
नेमके काय म्हणाले गिरीश महाजन?
जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना गिरीश महाजन म्हणाले, मराठा आरक्षणासंदर्भात जो जीआर काढण्यात आला, तो निर्णय एकट्या समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांचा नाही. तो समितीचा सामूहिक निर्णय आहे. सरकार म्हणून तो निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे कोणाला टार्गेट करणे योग्य नाही.
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याला महत्त्व नाही
यावेळी गिरीश महाजन यांना उद्धव आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंच्या संभाव्य एकत्र येण्याबद्दल विचारले असता, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याला मी महत्त्व देत नसल्याचे त्यांनी म्हटले. त्यांना एकत्र येऊ द्या, एकत्र येऊन फटाके फोडू द्या, त्यात काही वावगे नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कोणीही एकत्र आले तरी भाजप आणि महायुतीचाच विजय होईल, यात शंका नाही, असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला.
विजय वडेट्टीवारांसह काँग्रेसवर टीका
यावेळी गिरीश महाजन यांनी काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीवर बोट ठेवत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावरही टीका केली. “आम्ही (महायुती) आमच्या फॅक्टरीमध्ये एक आहोत, पण त्यांच्या काँग्रेसमध्येच चार नेते चार वेगवेगळ्या कोपऱ्यावर आहेत. त्यांच्याच पक्षातील नेत्यांची तोंडे एका दिशेला नाहीत. त्यामुळे त्यांनी आमच्यावर टीका करू नये,” असे म्हणत त्यांनी काँग्रेसमध्ये एकमत नसल्याचा दावा केला.
हे ही वाचा…
भुजबळांचा जामीन रद्द होऊ शकतो:ठाकरे गटाने व्यक्त केला संशय; मंत्रिमंडळाचा निर्णय मान्य नसेल तर राजीनामा देण्याचा दिला सल्ला
बीडमध्ये ओबीसी समाजाचा महाएल्गार मेळावा आक्रमकपणे पार पडल्यानंतर, आता या मेळाव्यातील वक्तव्यांनी राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप घडवला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर सभेत महायुतीतील सहकारी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर थेट टीका केल्यामुळे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भुजबळ यांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेत हल्लाबोल केला आहे. दानवे यांनी भुजबळ यांना थेट राजीनामा देण्याचा सल्ला देत, त्यांच्या जामिनाबाबतही सूचक विधान केले आहे. सविस्तर वाचा…
ओबीसी आरक्षण जाणार आहे याचे काही पुरावे आहेत का?:मंत्री विखे पाटील यांचा सवाल; OBC नेत्यांना राईचा पर्वत उभा न करण्याचा सल्ला
मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर अत्यंत आक्रमक भूमिका घेत महायुती सरकारने 2 सप्टेंबर रोजी जारी केलेला जीआर मागे घेण्याची मागणी केली आहे. त्यावर मंत्रिमंडळाच्या मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी ओबीसींचे आरक्षण जाणार आहे याचे काही पुरावे आहेत का? असा सवाल उपस्थित केला आहे. ओबीसी आरक्षण कमी होतंय किंवा जाणार आहे अथवा कमी होणार आहे याचे काही पुरावे आहेत का? हा राईचा पर्वत का उभा राहत आहे हेच मला कळत नाही? असे ते म्हणालेत. सविस्तर वाचा…
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.