digital products downloads

महाराष्ट्रातील इतर पक्ष कसे चालतील हे देवाभाऊच ठरवतात: मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे विधान; मुंबईच्या महापौर पदावरही नजर – Maharashtra News

महाराष्ट्रातील इतर पक्ष कसे चालतील हे देवाभाऊच ठरवतात:  मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे विधान; मुंबईच्या महापौर पदावरही नजर – Maharashtra News


महाराष्ट्रातील राजकारणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असलेली पकड सर्वश्रूत आहे. त्यांनी आपल्या मुरब्बी राजकारणाच्या जोरावर आतापर्यंत विरोधी पक्षांना निष्प्रभ केल्याचा दावा केला जातो. त्याची प्रचिती मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या एका विधानातून आ

.

मुंबई भाजपचा एक मेळावा शुक्रवारी मुंबईत पार पडला. त्यात बोलताना मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळत वरील विधान केले. यावेळी त्यांनी मुंबईत भाजपला महापौर झाल्यास आपली कॉलर टाईट होणार असल्याचाही दावा केला. मंत्री लोढा म्हणाले, आपण देवाभाऊंची वेगवेगळी रूपे पाहतोय. त्यांची 100 वेगवेगळी रूपे आहेत. त्यांनी मागील वर्षभरात अनेक कामे केली. ते नागपूरचे सर्वात तरुण महापौर झाले. भाजप देवाभाऊमय आहेच, पण महाराष्ट्रातील इतर पक्ष कसे चालतील हे देखील देवाभाऊच ठरवतात.

मी मागील 25 वर्षांपासून त्यांना पाहतोय. त्यांना राजकारण करण्याचे काम कधी आवडते तर कधी आवडत नाही. पण आपल्या कुटुंबातील सुखदुःखात ते लगेच तत्परतेने धावून येतात व अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतात. आज 5 डिसेंबर रोजी त्यांच्या शपथविधीला 1 वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे आम्ही 4 शहरांत एक सर्व्हे केला. लोकांना सरकारच्या कामगिरीविषयी काय वाटते? हा प्रश्न केला. त्यात 70 टक्के लोकांनी आपण सरकारच्या कामगिरीवर समाधानी असल्याचा फिडबॅक दिला.

मुंबईचा विश्वास न बसणारा विकास

लोढा म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाची घोषणा केली, तेव्हा तो होणार किंवा नाही याविषयी शंका उपस्थित करण्यात आली. पण आज या महामार्गाचे काम पूर्ण झाले व तो सुरूही झाला. त्यांच्या नेतृत्वात मुंबईचाही विश्वास न बसण्यासारखा विकास झाला आहे. त्यामुळे मुंबईकर मोठ्या आशेने आपल्याकडे पाहात आहे. त्यानुसार मुंबईला सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला काम करणे गरजेचे आहे, असे मंत्री लोढा म्हणाले.

मुंबईत भाजपचा महापौर बसवायचाय

मंगलप्रभात लोढा यांनी यांनी यावेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचेही तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले, मुंबई हे आपले घर आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकायची असेल तर ती केवळ अमित साटम किंवा राहुल नार्वेकर यांची जबाबदारी नाही. ती आपलीही जबाबदारी आहे. मुंबईत भाजपला महापौर बसला तर आपलीही कॉलर टाईट होईल. तुम्ही मुंबई भाजपचे अध्यक्ष झाला तेव्हा फक्त अमित साटम होतात. पण आता 100 दिवसांत तुम्ही आमच्यासाठी वरच्या अमितभाईंसारखे झालात.

अमित साटम मेहनती आहेत. ही त्यांची एकट्याची निवडणूक नाही. ते आपल्यासाठी परिश्रमाची परिकाष्ठा करत आहेत. आपली सेना भाजप आहे आणि सेनापती अमित साटम आहेत. मुंबईत आपला महापौर बसावयचा आहे. आपण ते आपले कर्तव्य म्हणून पार पाडूया, असेही मंगलप्रभात लोढा यावेळी बोलताना म्हणाले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp