
Maharashtra Government Survey: महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) सरकारला 5 डिसेंबर रोजी एक वर्ष पूर्ण झालं. या वर्षभरात सरकार समोर अनेक आव्हान आली. यात मराठा आरक्षणमी, कृषी कर्जमाफी – बच्चू कडू यांचं आंदोलन, भाषिक अस्मिता – त्रिभाषा सूत्र, अतिवृष्टीची नुकसान भरपाई यांचा समावेश होता. या सर्व आव्हानांना सरकारने त्यांच्या पद्धतीने कमी अधिक प्रमाणात तोंड देऊन जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीस सरकारसमोर वर्षभरात सर्वात मोठं आव्हान कोणतं होतं? असा प्रश्न झी 24 तास आणि JDS या संस्थेनं महासर्व्हेच्या माध्यमातून विचारला. त्यावर नेमकं काय उत्तर आलं पाहा.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारला 5 डिसेंबर 2025 रोजी पहिले वर्ष पूर्ण होत असताना, झी 24 तास आणि ज्युबिलंट डेटा स्टुडिओ (JDS) यांच्या सहकार्याने महाराष्ट्राचा राज्यव्यापी मतदान सर्व्हे करण्यात आला आहे. महायुती सरकारची गेल्या वर्षभराची कामगिरी कशी राहिली? कोणत्या योजना सामान्य लोकांच्या पसंतीला उतरल्या? सामान्य लोकांचं महायुती सरकारबाबत काय मत आहे? याचा कानोसा झी 24 तास आणि JDS या संस्थेनं एका महासर्व्हेच्या माध्यमातून घेतला आहे. यावेळी लाडकी बहीण संदर्भातही प्रश्न विचारण्यात आला.
देवेंद्र फडणवीस सरकारसमोर वर्षभरात सर्वात मोठं आव्हान कोणतं होतं?
देवेंद्र फडणवीस सरकारसमोर वर्षभरात सर्वात मोठं आव्हान कोणतं होतं? अशा प्रश्न विचारून याच्या उत्तरासाठी मराठा आरक्षण, कृषी कर्जमाफी – बच्चू कडू यांचं आंदोलन, भाषिक अस्मिता – त्रिभाषा सूत्र, अतिवृष्टीची नुकसान भरपाई असे पर्याय देण्यात आले होते. यात लोकांनी मराठा आरक्षणला सर्वाधिक 35 टक्के, कृषी कर्जमाफी – बच्चू कडू यांचं आंदोलनला 24 टक्के, भाषिक अस्मिता – त्रिभाषा सूत्रला 19 टक्के, अतिवृष्टीची नुकसान भरपाईला 22 टक्के असं मत व्यक्त केलं. म्हणजेच लोकांनी थोड्यात गेल्या वर्षभरात देवेंद्र फडणवीस सरकारसमोर सर्वात मोठं आव्हान मराठा आरक्षणाचं होतं असं म्हंटलंय .

झी 24 तास आणि JDS चा महासर्व्हे :
14 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान हा सर्व्हे करण्यात आला आहे. यामध्ये एकूण 89 हजार 812 जणांना समाविष्ट करण्यात आलं. या सर्वेक्षणात, सामाजिक-राजकीय संशोधन व डेटा विश्लेषणातील दोन पद्धतींचा वापर करण्यात आला आहे.
पहिल्या पद्धतीत प्रत्यक्ष भेटी व घरघर फिरून सर्व्हे करण्यात आला आहे. यामध्ये 4 महानगरं, 24 जिल्हे, 37 नगरपरिषदा व 48 तालुके समाविष्ट होते. यादरम्यान 22 हजार 654 जणांच्या वैयक्तिक मुलाखती घेण्यात आल्या.
तर दुसरा टेलिया मोबाईल-आधारित AI व्हॉइस सर्व्हे आहे. मोबाईलद्वारे अत्याधुनिक, संवादात्मक AI-आधारित व्हॉइस सर्व्हेमध्ये 67 हजार 158 जणांना समाविष्ट करण्यात आलं.
AI टेलिफोनिक व्हॉइस सर्व्हे आणि प्रत्यक्ष संवादामुळे महाराष्ट्रातील जनमताचा कानोसा घेणारे हे सर्वेक्षण आगळे वेगळे ठरले आहे.
महाराष्ट्रातील सर्व्हेची भौगोलिक व्याप्ती:
कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्र या विविध विभागांचे संतुलित प्रतिनिधित्व मिळावे यासाठी खालील 4 महानगरं, 24 जिल्हे, 37 नगरपरिषदा व 48 तालुके येथे सर्व्हे करण्यात आला.
FAQ :
झी 24 तास–JDS महासर्व्हे कधी करण्यात आला?
१४ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत हा राज्यव्यापी सर्व्हे घेण्यात आला.
देवेंद्र फडणवीस सरकारसमोर सर्वात मोठं आव्हान कोणतं असल्याचं लोकांनी मत व्यक्त केलं?
लोकांनी मराठा आरक्षण हे सर्वात मोठं आव्हान असल्याचं म्हटलं (३५%).
सर्व्हेचा मुख्य उद्देश काय होता?
फडणवीस सरकारच्या पहिल्या वर्षातील कामगिरी, जनता समाधानी आहे का, कोणत्या योजना प्रभावी ठरल्या आणि सरकारसमोरील प्रमुख आव्हानांबाबत जनमत जाणून घेणे हा उद्देश होता.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



