digital products downloads

‘आगोदर एसटीच्या…’, भाडेवाढीची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना परिवहन मंत्र्यांनी झापलं

‘आगोदर एसटीच्या…’, भाडेवाढीची मागणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना परिवहन मंत्र्यांनी झापलं

ST Bus Fare Hike: MSRTC ही महाराष्ट्रातील लाखो प्रवाशांची रोजची सोबती मानली जाते. ग्रामीण भागापासून शहरापर्यंत शिक्षण, नोकरी, बाजारपेठ आणि उपचारांसाठी लोक मोठ्या प्रमाणात एसटीवर अवलंबून असतात. अलीकडे इंधन आणि सुटे भाग महागल्यामुळे भाडेवाढ होणार अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र प्रवाशांना दिलासा देणारा निर्णय समोर आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाडेवाढीचा प्रस्ताव नाकारत आधी सेवा सुधारण्यावर भर देण्याचे स्पष्ट संकेत दिले. त्यांच्या या भूमिकेमुळे प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

Add Zee News as a Preferred Source

एसटी भाडेवाढ प्रस्तावाला नकार
महामंडळाने सुमारे 2 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव शासनासमोर मांडला होता. खर्च वाढल्याचे कारण देण्यात आले होते. पण मंत्री सरनाईक यांनी हा प्रस्ताव थेट फेटाळला. गेल्या वर्षीच जवळपास 14.95 टक्के दरवाढ झाल्याने लोकांमध्ये नाराजी होती, त्यामुळे पुन्हा वाढ योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीत अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सूचना देण्यात आल्या. बसेस वेळेवर सुटणे आणि नियोजित वेळेत पोहोचणे याला सर्वाधिक महत्त्व द्यावे असे सांगण्यात आले. त्यांच्या मते प्रवासी सर्वप्रथम विश्वासार्ह सेवा पाहतो, भाडे नंतर येते.

उशीर आणि रद्द फेऱ्यांवर नाराजी
अनेक ठिकाणी बस उशिरा येणे, प्रवासात बिघाड होणे किंवा फेरी रद्द होणे अशा तक्रारी वाढल्याचे निदर्शनास आले. अशा प्रकारांमुळे लोक खाजगी वाहनांकडे वळतात. आगार स्तरावर जबाबदारी निश्चित करून प्रत्येक फेरी वेळेत निघेल याची काळजी घ्यावी, असे आदेश देण्यात आले.

मंत्र्यांनी स्पष्ट केले की वेळेवर धावणारी बस म्हणजे वाढत्या महसुलाकडे जाणारे पाऊल आहे. प्रवाशांना ताटकळत ठेवले तर ते पर्याय शोधतात. त्यामुळे सेवा सुधारली तरच प्रवासी संख्या वाढेल आणि आर्थिक स्थिती सुधारेल.

हे ही वाचा: ‘या’ 2 प्रश्नांची उत्तरं सापडली तरी उलगडेल अजित पवारांच्या विमान क्रॅशचं गूढ? लँडिंगसाठी…

खर्च नियंत्रण आणि व्यवस्थापन सुधारणा
महामंडळाचा वाढता खर्च लक्षात घेऊन काटकसरही आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. नियमित देखभाल, संसाधनांचा योग्य वापर आणि शिस्तबद्ध कामकाज यावर भर देण्याचे निर्देश दिले. स्थानिक पातळीवर नियोजन केल्यास अनावश्यक खर्च कमी होऊ शकतो.

एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असल्याने तिच्यावर लोकांचा विश्वास टिकवणे महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले. सुरक्षित, वेळेवर आणि परवडणारी सेवा देणे हा पुढील काळातील मुख्य उद्देश राहणार आहे. प्रवासी समाधानी राहिल्यासच महामंडळ आर्थिकदृष्ट्या मजबूत होईल, असा संदेश प्रशासनाला देण्यात आला.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp