digital products downloads

राष्ट्रवादीतच भाजपचे लोक, त्यांचा पक्षाला पोकळ करण्याचा प्रयत्न: बच्चू कडूंचा आरोप; म्हणाले- भाजपसोबत न मैत्री बरी, न शत्रुत्व – Amravati News

राष्ट्रवादीतच भाजपचे लोक, त्यांचा पक्षाला पोकळ करण्याचा प्रयत्न:  बच्चू कडूंचा आरोप; म्हणाले- भाजपसोबत न मैत्री बरी, न शत्रुत्व – Amravati News



अमरावती येथे आयोजित कार्यक्रमात प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसबाबत गंभीर आरोप केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच पाच ते सहा जण असे आहेत, जे प्रत्यक्षात भाजपचेच काम करत आहेत. हे लोक थेट भाजपमध्ये प्रवेश करण्याऐवजी राष्ट्रवादीत राहून पक्षाला आतून पोकळ करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केला. राष्ट्रवादीत राहून भाजपची बाजू घेणारे काही नेते पक्षाला कमजोर करत असून, राष्ट्रवादीला कमी करण्याची ही भाजपची खेळी असल्याचा आरोप कडू यांनी केला. भाजपपासून सावध राहण्याचा सल्ला देताना कडू म्हणाले की, भाजप आपल्या मित्रपक्षांनाही संपवण्याचे राजकारण करतो. त्यांनी यापूर्वीही भाजपवर जोरदार टीका करत हा पक्ष विषारी सापासारखा असल्याची उपमा दिली होती. भाजपसोबत न मैत्री बरी, न शत्रुत्व, असे म्हणत आम्ही शत्रुत्व स्वीकारले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ते कधीही नाग पाठवू शकतात, अशा शब्दांत त्यांनी राजकीय इशारा दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील सत्तासमीकरणांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे अकाली निधन झाले. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित होत असताना बच्चू कडू यांनी भाजपवर निशाणा साधला. लोक भाजपकडे संशयाने पाहतात, असे ते म्हणाले. भाजपने खांद्यावर हात जरी टाकला, तरी लोक म्हणतात हा मेला, अशी खोचक प्रतिक्रिया देत त्यांनी वातावरण अधिक तापवले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय चर्चेला वेग आला आहे. कडू यांनी सरकारच्या आर्थिक धोरणांवरही टीका केली. पंधराशे रुपये देऊन मते मिळवण्याचा प्रयत्न होत असताना दुसरीकडे स्मार्ट मीटरच्या माध्यमातून जनतेकडून पैसे वसूल केले जात आहेत, असा आरोप त्यांनी केला. एकीकडून द्यायचे आणि दुसरीकडून काढून घ्यायचे हीच सरकारची नीती आहे, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफी मिळालेली नाही, यावरून त्यांनी सरकारला धारेवर धरले. शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास महाराष्ट्रात रेल्वे चालू देणार नाही, असा इशारा देत त्यांनी आगामी काळात गनिमी काव्याने आंदोलन छेडण्याचे संकेत दिले. शेतकरी प्रश्नावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करताना कडू यांनी आरोग्य विभागातील निर्णयांवरही प्रश्न उपस्थित केले. पूर्वी सिव्हिल सर्जनकडे असलेले औषध खरेदीचे अधिकार आता मंत्रालयाने स्वतःकडे घेतल्याने भ्रष्टाचाराला वाव मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला. कमिशनसाठी औषधांचे दर वाढवले जात आहेत, असेही ते म्हणाले. ना खाऊंगा, ना खाने दूंगा, म्हणणारेच आज टेंडर प्रक्रियेतून सर्वाधिक भ्रष्टाचार करत आहेत, असा टोला त्यांनी लगावला. संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरूनही त्यांनी संताप व्यक्त केला. ज्या दिव्यांगांना दोन पाय नाहीत, त्यांचे पगार वेळेवर न देणाऱ्यांच्या कानफटात मारण्याची वेळ आली आहे, असे तीव्र शब्दांत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. बच्चू कडू यांच्या या सलग आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेद, भाजपवर केलेले गंभीर आरोप, शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून त्यांनी उभा केलेला संघर्ष पुढील काळात आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp