digital products downloads

SSC Exam: दहावीच्या परीक्षेला होतेय सुरुवात, विद्यार्थी-पालकांनी कोणत्या गोष्टी ठेवाव्या लक्षात? आताच जाणून घ्या!

SSC Exam: दहावीच्या परीक्षेला होतेय सुरुवात, विद्यार्थी-पालकांनी कोणत्या गोष्टी ठेवाव्या लक्षात? आताच जाणून घ्या!

SSC Exam: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने दहावीची बोर्ड परीक्षा उद्यापासून म्हणजे 20 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. यावर्षी राज्यभरातून 16 लाख 15 हजार 489 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 3 हजार 879 जास्त विद्यार्थी परीक्षा देत आहेत. यात 8 लाख 65 हजार 740 मुले, 7 लाख 49 हजार 736 मुली आणि 15 तृतीयपंथी विद्यार्थी आहेत. नियमित शाळेतील 15 लाख 56 हजार 594 तर खासगी 29 हजार 301 विद्यार्थी सहभागी होत आहेत. दहावीचे परीक्षार्थी आणि त्यांच्या पालकांनी काय काळजी घ्यावी? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

परीक्षा कधी आणि कुठे होणार?

ही परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्चपर्यंत चालणार आहे. राज्यातील 23 हजार 683 शाळांमधील विद्यार्थी 5 हजार 111 परीक्षा केंद्रांवर परीक्षा देतील. गेल्यावर्षी 5 हजार 130 केंद्रे होती. पण काही केंद्रांवर गैरप्रकार झाल्याने 31 केंद्रे रद्द केली गेली. पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर, नाशिक आदी 9 विभागीय मंडळांमार्फत ही व्यवस्था केली आहे.

विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी?

प्रत्येक विद्यार्थ्याने परीक्षा केंद्रावर नेमलेल्या वेळेपूर्वी किमान अर्धा तास आधी पोहोचणे गरजेचे आहे. सकाळच्या सत्रात साडेदहा वाजता आणि दुपारच्या सत्रात २.३० वाजता परीक्षा दालनात बसावे लागेल. मागील वर्षाप्रमाणे यंदाही प्रत्येक पेपरला १० मिनिटे जास्त वेळ दिला आहे. फक्त मंडळाने छापलेले अधिकृत वेळापत्रकच मान्य करा, इतर कोणतेही वेळापत्रक वापरू नका.

कॉपी रोखण्यासाठी कडक उपाय

बारावीत झालेल्या सामूहिक कॉपी प्रकरणामुळे दहावीत गैरप्रकार टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेतली आहे. 271 भरारी पथके, विभागीय विशेष पथके, केंद्रावर बसणारी पथके आणि पोलीस बंदोबस्त ठेवला जाईल. गेल्या वर्षी गैरप्रकार झालेल्या केंद्रांवर कठोर कारवाई झाली आहे. यामुळे यंदा केंद्रांची संख्याही कमी झाली आहे.

पालकांनी काय काळजी घ्यावी?

पालकांनी मुलांना परीक्षेच्या दिवशी शांत ठेवावे. सकाळी लवकर उठवून नाश्ता करून, प्रवासाची व्यवस्था करावी. परीक्षा केंद्राच्या 500 मीटर परिसरातील फोटोकॉपी दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र, ओळखपत्र आणि आवश्यक स्टेशनरी सोबत घ्यावी. मोबाईल, कॅल्क्युलेटर किंवा इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू न घेणे महत्त्वाचे आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी काय नियोजन?

9 हजार 788 दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा उपलब्ध आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी, पुरेसे पाणी प्या, मास्क घाला आणि शांतपणे परीक्षा द्या. पालकांनी मुलांच्या मनात भीती न घालता प्रोत्साहन द्यावे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp