
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव येथील वादग्रस्त पुतळा प्रकरणात पोलिसांनी तपासाचा फास अधिक आवळला आहे. पुतळा पुरवणारा मुख्य सूत्रधार बाळराजे ऊर्फ बाळू आवारे याच्या जालन्यातील कारखान्यावर प्रशासनाने टाळे ठोकले असून, त्याच्या एका जवळच्या साथीदारालाही सोलापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे अनधिकृत पुतळे तयार करणाऱ्या आणि बसवणाऱ्या टोळीचे धाबे दणाणले आहेत. माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे धनगर समाजाच्या देवस्थान परिसरात बाळू आवारेने कोणत्याही कायदेशीर परवानगीशिवाय रात्रीतून पुतळा बसवला होता. या घटनेमुळे दोन समाजांमध्ये तणाव निर्माण होऊन त्याचे रूपांतर दगडफेक आणि दंगलीत झाले होते. या प्रकरणात दोन्ही गटांतील अनेकांवर आणि मुख्य सूत्रधारावर आतापर्यंत आठ गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कृषी केंद्राच्या नावाखाली पुतळा निर्मितीचा बनाव जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील चुर्मापुरी येथे बाळू आवारेचा हा कारखाना सुरू होता. धक्कादायक बाब म्हणजे, शासकीय गायरान जमिनीवर ‘कृषी अवजारे सेवा केंद्र’ असल्याचे भासवून एका पत्र्याच्या शेडमध्ये अनधिकृतपणे पुतळ्यांची निर्मिती केली जात होती. अंबडच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार, पोलिसांनी या कारखान्यावर धाड टाकून तो सील केला आहे. सहकाऱ्याला सीमेवरून अटक बाळू आवारेला तीन दिवसांपूर्वीच पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर आता त्याचा सहकारी संभाजी आघाव याला सोलापूर-धाराशिव सीमेवरून पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी विशेष पथके तैनात केली आहेत. गंभीर गुन्ह्यांची नोंद बाळू आवारेवर केवळ माढाच नव्हे, तर करमाळा तालुक्यातील पुनावर येथेही अशाच प्रकारे विनापरवाना पुतळा बसवल्याचा आरोप आहे. त्याच्यावर जातीय तेढ निर्माण करणे, चिथावणीखोर भाषणे देणे, पोलिसांवर हल्ला करणे आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे यांसारखे गंभीर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. हे ही वाचा… मुंबईकरांचा प्रवास सुसाट!:दहिसर-काशिगाव मेट्रोचे मुख्यमंत्र्यांकडून लोकार्पण; मिरा-भाईंदरच्या ‘त्या’ वादग्रस्त उड्डाणपुलावरही दिले स्पष्टीकरण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई मेट्रो मार्ग ९ च्या पहिल्या टप्प्याचे थाटात उद्घाटन करण्यात आले. दहिसर पूर्व ते काशिगाव दरम्यान धावणारी ही नवी मेट्रो मार्गिका बुधवारपासून सर्वसामान्यांच्या सेवेत दाखल होणार असून, यामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, या सोहळ्याला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी जगभरात चर्चेचा विषय ठरलेल्या मिरा-भाईंदर येथील उड्डाणपुलाच्या वादग्रस्त रचनेवरही भाष्य करत प्रशासनाची बाजू मांडली. सविस्तर वाचा…
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.





