digital products downloads

Asia Cup 2025: भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावरुन आदित्य ठाकरे BCCI वर संतापले; काय म्हणाले?

Asia Cup 2025: भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावरुन आदित्य ठाकरे BCCI वर संतापले; काय म्हणाले?

Aaditya Thackeray on India Vs Pakistan: शिवसेना (यूबीटी) नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी आशिया कपमधील भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याला तीव्र विरोध दर्शवलाय.  सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर त्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडलीय. पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणे हे केवळ देशविरोधीच नाही, तर मानवतेच्या विरोधात आहे. ठाकरे यांनी बीसीसीआयवर पैशासाठी देशहित बाजूला ठेवल्याचा गंभीर आरोप केला आणि हा निर्णय शहीदांच्या बलिदानाचा अपमान असल्याचे म्हटले. काय म्हणाले आदित्य ठाकरे? सविस्तर जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

पाकिस्तानचे दहशतवादी कनेक्शन

आदित्य ठाकरे यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला. हा तोच देश आहे जिथून पहलगामसारख्या ठिकाणी निष्पाप भारतीयांवर दहशतवादी हल्ले होतात. अशा देशाशी क्रिकेट खेळणे म्हणजे शहीदांचा अनादर आहे. पाकिस्तानने यापूर्वी भारतात झालेल्या आशिया कप (हॉकी) स्पर्धेवर बहिष्कार टाकला होता, याची आठवणही त्यांनी करुन दिली. बीसीसीआय केवळ आर्थिक लाभासाठी अशा देशाशी सामने खेळण्यास तयार आहे, जे लज्जास्पद असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली. 

केंद्र सरकारच्या मौनावर प्रश्न

आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सरकारने नेहमीच आंतरराष्ट्रीय मंचांवर पाकिस्तानला दहशतवादाचा पुरस्कर्ता ठरवलंय आणि निवडणूक प्रचारात सशस्त्र दलांच्या कारवाईचा बडेजाव केलाय. मग आता बीसीसीआयला पाकिस्तानशी सामने खेळण्यास परवानगी देण्यावर सरकार गप्प का आहे?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

देशहितासाठी बीसीसीआयला आवाहन

ठाकरे यांनी बीसीसीआयला देशाच्या सन्मानासाठी आणि शहीदांच्या बलिदानाला मान देण्यासाठी पाकिस्तानसोबत कोणतेही द्विपक्षीय किंवा बहुपक्षीय सामने न खेळण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला आश्रय देणे थांबवत नाही, तोपर्यंत त्यांच्याशी क्रीडा संबंध ठेवणे देशाच्या सुरक्षेचा विश्वासघात असल्याची टीका आदित्य ठाकरे म्हणाले. भारत विरुद्ध पाकिस्तान या क्रिकेट सामन्याला ठाकरेंच्या शिवसेनेकडून कडाडून विरोध केला जातोय.

निर्णयाचा फेरविचार करा

बीसीसीआयने आपल्या निर्णयाचा फेरविचार करून देशहिताला प्राधान्य देण्याची मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे.“पाकिस्तानच्या दहशतवादी कृत्यांमुळे रक्तरंजित झालेल्या सीमेची किंमत इतकी स्वस्त आहे का?” असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.

FAQ

प्रश्न: आदित्य ठाकरे यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याला का विरोध केला आहे?

उत्तर: आदित्य ठाकरे यांनी आशिया कपमधील भारत-पाकिस्तान सामन्याला विरोध केला आहे, कारण त्यांच्या मते, दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणे देशविरोधी आणि मानवताविरोधी आहे. त्यांनी सांगितले की, पाकिस्तानमधून येणारे दहशतवादी निष्पाप भारतीयांवर हल्ले करतात आणि अशा देशाशी सामने खेळणे शहीदांचा अपमान आहे.

प्रश्न: आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर कोणता आरोप केला आहे?

उत्तर: ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या मौनावर प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, सरकारने नेहमीच पाकिस्तानला दहशतवादाचा पुरस्कर्ता ठरवले आहे आणि निवडणुकीत सशस्त्र दलांच्या कारवाईचा बडेजाव केला आहे. तरीही, बीसीसीआयला पाकिस्तानशी सामने खेळण्याची परवानगी देण्यावर सरकार गप्प का आहे, असा सवाल त्यांनी केला.

प्रश्न: शिवसेना (यूबीटी) आणि आदित्य ठाकरे यांनी बीसीसीआयला काय आवाहन केले आहे?

उत्तर: शिवसेना (यूबीटी) ने बीसीसीआयला पाकिस्तानसोबत कोणतेही द्विपक्षीय किंवा बहुपक्षीय सामने न खेळण्याचे आवाहन केले आहे, जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला आश्रय देणे थांबवत नाही. ठाकरे यांनी बीसीसीआयला देशहित आणि शहीदांच्या सन्मानासाठी निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे, तसेच पक्षाने या सामन्याला तीव्र विरोध व्यक्त केला आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp