digital products downloads

Fact Check: 3 दिवस की 1 दिवस?; महाराष्ट्रातील शाळांना नेमकी किती दिवस सुट्टी? शिक्षण विभागाने केलं स्पष्ट!

Fact Check: 3 दिवस की 1 दिवस?; महाराष्ट्रातील शाळांना नेमकी किती दिवस सुट्टी? शिक्षण विभागाने केलं स्पष्ट!

School Closed: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे  विमान अपघातात निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र शोकाकूल झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शाळा-कॉलेजांसाठी तात्काळ सुट्टी जाहीर केल्याचे वृत्त सोशल मीडियात व्हायरल झाले. 3 दिवस सुट्टी असल्याचे यात म्हटले होते. पण आता शिक्षण विभागाने यावर स्पष्टीकरण दिले आहे.  याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Add Zee News as a Preferred Source

फक्त एकच दिवस सुट्टी 

शिक्षण विभागाच्या अधिकृत सूचनेनुसार, राज्यातील शाळांना केवळ आज एक दिवस सुट्टी देण्यात आली आहे. 29 जानेवारी किंवा त्यानंतरच्या दिवशी शाळा नियमित सुरू राहतील. काही जिल्ह्यांत स्थानिक पातळीवर वेगळे निर्णय असू शकतात, पण राज्यव्यापी फक्त आजच सुट्टी आहे. पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधून खात्री करावी. शिक्षण विभागाने यासंदर्भात निर्देश दिले आहेत. 

तीन दिवस सुट्टीचा दावा 

सोशल मीडिया आणि काही वृत्तवाहिन्यांवर तीन दिवस शाळा बंद राहणार अशी माहिती व्हायरल झाली आहे. ही माहिती चुकीची आहे. अशा बातम्यांमुळे पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शिक्षण विभागाने यावर स्पष्टता आणली आहे. असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचना पाहाव्यात, असे त्यांनी म्हटले आहे.

तीन दिवस दुखवटा पण सुट्टी नाही

राज्य सरकारने अजित पवार यांच्या निधनानिमित्त तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. या काळात सरकारी कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम रद्द राहतील आणि ध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल. मात्र, याचा अर्थ शाळांना तीन दिवस सुट्टी मिळेल असा नाही. दुखवटा हा भावनिक आदरांजली आहे, तर सुट्टी हा वेगळा प्रशासकीय निर्णय आहे. फक्त आज सुट्टी असल्याने पालकांनी याची नोंद घ्यावी, असे शिक्षण विभागाने म्हटले आहे. 

पालक-विद्यार्थ्यांना सल्ला

पालकांनी सोशल मीडियावरील बातम्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावे. शाळांच्या सुट्टीबाबत फक्त शिक्षण विभाग किंवा संबंधित शाळेच्या अधिकृत सूचनांवर विश्वास ठेवावा. आवश्यकता भासल्यास शाळा प्रशासनाशी थेट संपर्क साधावा. अशा प्रसंगी अफवा पसरवणे टाळावे आणि शांततेने स्थिती हाताळावी. हे दु:खद प्रसंगी सर्वांनी एकत्र येऊन आदर व्यक्त करावा, असा सल्ला देण्यात आलाय.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp