
Farmer ID: राज्यात अतिवृष्टीग्रस्तांसाठी सरकारकडून 31 हजार 628 कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आलंय. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना आर्थिक भरीव मदत मिळणार आहे… मात्र त्यासाठी शेतकऱ्यांकडे आपले फार्मर आयडी असणे आवश्यक आहे.. त्यामुळे ज्यांच्याकडे फार्मर आयडी नसतील अशा शेतकऱ्यांना तत्काळ फार्मर आयडी काढणं गरजेचं आहे.
शेतकऱ्यांना अतिवृष्टीची आर्थिक मदत हवी असेल तर फार्मर आयडी आणि आधार लिंक असणे गरजेचे आहे. अन्यथा मदतीपासून वंचित राहू शकता. राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. या शेतकऱ्यांना सरकारने मदतीचा होत देत 31 हजार 628 कोटींचं पॅकज जाहिर केलंय.ही मदत शेतकऱ्यांचा थेट खात्यात जमा केली जाणार आहे.दिवाळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र त्यासाठी शेतकऱ्यांचा फार्मर आयडी आणि आधार कार्ड लिंक असणं आवश्यक आहे.
फार्मर आयडी जर आधार कार्ड़ला लिंक नसेल तर मात्र पूरग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाहीत असा शेतकऱ्यांना तत्काळ फार्मर आयडी काढून घेण्याचं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलंय.
शेतकऱ्यांना सरकारच्या योजनांसाठी आधारकार्ड प्रमाणे फार्मर आयडी असणंही गरजेचं आहे. सहा महिन्यांपासून फार्मर आयडी काढण्यासाठी कृषी विभागाकड़ून आग्रह धरला जातोय.. मात्र आतापर्यंत 80 टक्के शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेत तर 20 टक्के शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडी काढलेला नाहीय.
फार्मर आयडी कसा काढावा?
तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, कृषी सेवकांशी संपर्क करा. ग्रामसेवक, तलाठ्याकडेही मदत मिळू शकते.सेतू केंद्रात फार्मर आयडी काढून मिळेल.
पिक विमा आर्थिक मदतीच्या नावाने अनेकांनी बोगस अनुदान लाटल्याचे प्रकार समोर आलेत. जळगाव नाशिक जिल्ह्यामध्ये अनेकांवर गुन्हे दाखल झालेत. त्यामुळे फार्मर आयडीला आधार लिंक केलं तरच अनुदान वाटप होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सावध व्हा आणि वेळीच फार्मर आयडी काढून सरकारच्या योजनांचा लाभ घ्या.
FAQ
प्रश्न: अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने कोणते पॅकेज जाहीर केले आहे आणि त्याचा उद्देश काय आहे?
उत्तर: महाराष्ट्र सरकारने अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे मोठे मदत पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेजअंतर्गत कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर १८,५०० रुपये, बागायती शेतकऱ्यांना २७,५०० रुपये, फळबागांसाठी ३२,५०० रुपये, विहिरी स्वच्छतेसाठी ३०,००० रुपये आणि दुधाळ जनावरांसाठी ३७,००० रुपये प्रति जनावर मदत दिली जाईल. हा निधी दिवाळीपूर्वी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल आणि पिकांच्या नुकसानीची भरपाई होईल.
प्रश्न: अतिवृष्टी मदतीसाठी फार्मर आयडी का आवश्यक आहे आणि त्याची आधार कार्डशी लिंकिंग कशी करावी?
उत्तर: अतिवृष्टी मदत पॅकेजचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असणे अनिवार्य आहे, अन्यथा ते मदतीपासून वंचित राहू शकतात. फार्मर आयडी आधार कार्डला लिंक नसल्यास अनुदान वाटपात अडचणी येतात, कारण ही प्रक्रिया पारदर्शकतेसाठी आहे. लिंकिंगसाठी तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक किंवा ग्रामसेवक/तलाठ्याकडे संपर्क साधा. सेतू केंद्रातही ही सुविधा उपलब्ध आहे. राज्यातील ८०% शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढली असली तरी उर्वरित २०% शेतकऱ्यांना तत्काळ काढण्याचे कृषी विभागाचे आवाहन आहे.
प्रश्न: फार्मर आयडी कसे काढावे आणि बोगस मदतीपासून कसे सावध राहावे?
उत्तर: फार्मर आयडी काढण्यासाठी तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, कृषी सेवक, ग्रामसेवक, तलाठा किंवा सेतू केंद्राशी संपर्क साधा. आवश्यक कागदपत्रे (आधार कार्ड, शेती प्रमाणपत्र) घेऊन अर्ज करा; प्रक्रिया साधी आणि मोफत आहे. बोगस अनुदानाच्या नावाने फसवणुकीचे प्रकार (जसे जळगाव-नाशिकमध्ये गुन्हे दाखल झाले) टाळण्यासाठी फार्मर आयडीला आधार लिंक करा. सरकारच्या अधिकृत कार्यालयांमधूनच मदत मिळते; कोणत्याही मध्यस्थाकडून पैसे देण्याचे सापडे करू नका.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.