digital products downloads

Maharashtra Government Survey: गेल्या वर्षभरात महाराष्ट्रातील बेरोजगारीची समस्या कमी झाली की वाढली? जनतेने स्पष्टच सांगितलं

Maharashtra Government Survey: गेल्या वर्षभरात महाराष्ट्रातील बेरोजगारीची समस्या कमी झाली की वाढली? जनतेने स्पष्टच सांगितलं

Maharashtra Government Survey:  राज्यातील महायुती सरकारला एक वर्षे पूर्ण झाले असून सरकारने राज्यातील बेरोजगारीबाबत कोणत्या योजना राबवल्या आहेत. याबाबत बेरोजगारी कमी करण्यासाठी सरकारने कोणती पाऊले उचलली. याबाबत महाराष्ट्रातील जनतेला काय वाटतं? याचाच आढावा घेण्याचा प्रयत्न  झी 24 तास आणि ज्युबिलंट डेटा स्टुडिओ (JDS) यांनी सर्व्हेतून केला आहे.  झी 24 तास आणि ज्युबिलंट डेटा स्टुडिओ (JDS) यांच्या सहकार्याने महाराष्ट्राचा राज्यव्यापी मतदान सर्व्हे करण्यात आला आहे. ज्यामध्ये गेल्या वर्षभरात महाराष्ट्रातील बेरोजगारीची समस्या कमी झाली की वाढली? याबाबत त्यांनी सर्व्हे करून त्याची आकडेवारी जाहीर केली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

गेल्या वर्षभरात महाराष्ट्रातील बेरोजगारीची समस्या कमी झाली की वाढली?

महाराष्ट्रातील बेरोजगारीच्या प्रश्नावर अलीकडेच झी 24 तास आणि ज्युबिलंट डेटा स्टुडिओ (JDS) यांनी केलेल्या सर्व्हेतून राज्यातील रोजगारस्थितीबाबत एक महत्त्वपूर्ण चित्र समोर आले आहे. गेल्या वर्षभरात बेरोजगारीची समस्या कमी झाली की वाढली, याबाबत नागरिकांनी मिश्र, पण एकंदरीत सकारात्मक प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

यामध्ये सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 40 टक्के नागरिकांनी सांगितले की, गेल्या वर्षाच्या तुलनेत राज्यात बेरोजगारी थोडी कमी झाली आहे. तर 21 टक्के लोकांच्या मते बेरोजगारीची समस्या खूप कमी झाली आहे. सर्वेक्षणातील 19 टक्के नागरिकांनुसार गेल्या वर्षाच्या तुलनेत बेरोजगारीची परिस्थिती बदललेली नाही.  एकंदर बेरोजगारी वाढली असे मानणाऱ्यांचे प्रमाण 20 टक्के इतके आहे. यामध्ये 12 टक्के लोकांनी बेरोजगारी ‘वाढली’ असे सांगितले तर 8 टक्के लोकांनी ‘खूप वाढली’ असे मत व्यक्त केले.

Maharashtra Government Survey: गेल्या वर्षभरात महाराष्ट्रातील बेरोजगारीची समस्या कमी झाली की वाढली? जनतेने स्पष्टच सांगितलं

झी 24 तास आणि JDS चा महासर्व्हे

14 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान हा सर्व्हे करण्यात आला आहे. यामध्ये एकूण 89 हजार 812 जणांना समाविष्ट करण्यात आलं. या सर्वेक्षणात, सामाजिक-राजकीय संशोधन व डेटा विश्लेषणातील दोन पद्धतींचा वापर करण्यात आला आहे. 

पहिल्या पद्धतीत प्रत्यक्ष भेटी व घरघर फिरून सर्व्हे करण्यात आला आहे. यामध्ये 4 महानगरं, 24 जिल्हे, 37 नगरपरिषदा व 48 तालुके समाविष्ट होते. यादरम्यान 22 हजार 654 जणांच्या वैयक्तिक मुलाखती घेण्यात आल्या.

तर दुसरा टेलिया मोबाईल-आधारित AI व्हॉइस सर्व्हे आहे.  मोबाईलद्वारे अत्याधुनिक, संवादात्मक AI-आधारित व्हॉइस सर्व्हेमध्ये 67 हजार 158 जणांना समाविष्ट करण्यात आलं. 

AI टेलिफोनिक व्हॉइस सर्व्हे आणि प्रत्यक्ष संवादामुळे महाराष्ट्रातील जनमताचा कानोसा घेणारे हे सर्वेक्षण आगळे वेगळे ठरले आहे.

महाराष्ट्रातील सर्व्हेची भौगोलिक व्याप्ती: कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्र या विविध विभागांचे संतुलित प्रतिनिधित्व मिळावे यासाठी खालील 4 महानगरं, 24 जिल्हे, 37 नगरपरिषदा व 48 तालुके येथे सर्व्हे करण्यात आला.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp