digital products downloads

Maharashtra Government Survey: राज्याची आर्थिक घडी बसवण्यात सरकार किती यशस्वी? जनतेने दिला कौल

Maharashtra Government Survey: राज्याची आर्थिक घडी बसवण्यात सरकार किती यशस्वी? जनतेने दिला कौल

Maharashtra Government Survey: राज्यातील महायुती सरकारला आज 5 डिसेंबर 2025 रोजी एक वर्षे पूर्ण झालं आहे. एक वर्षाच्या कालावधीत महायुती सरकारने राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अनेक योजना राबवल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबद्दल अनेकदा जाहीर भाषणांमधून याबद्दल सांगितलं आहे. मात्र राज्यातील जनतेला याबाबत नेमकं काय वाटतं? हे जाणून घेण्याचा प्रयत्न  झी 24 तास आणि ज्युबिलंट डेटा स्टुडिओ (JDS) यांनी सर्व्हेतून केला आहे.  झी 24 तास आणि ज्युबिलंट डेटा स्टुडिओ (JDS) यांच्या सहकार्याने महाराष्ट्राचा राज्यव्यापी मतदान सर्व्हे करण्यात आला आहे. यामध्ये राज्याची आर्थिक परिस्थिती सांभाळण्यात सरकार यशस्वी झालंय का? याचाही कानोसा घेतला आहे.

Add Zee News as a Preferred Source

राज्याची आर्थिक परिस्थिती सांभाळण्यात सरकार यशस्वी झालंय का?

राज्य सरकारने गेल्या काही वर्षांत आर्थिक परिस्थिती सावरण्यासाठी विविध पावले उचलली असली तरी जनतेला याबाबत कितपत समाधान वाटतंय? एका सर्वेक्षणातून समोर आलेल्या आकडेवारीनं याच प्रश्नाचं नेमकं उत्तर दिलं आहे. या सर्वेक्षणात नागरिकांनी राज्याच्या आर्थिक व्यवस्थापनावर आपलं मत नोंदवलं असून परिणाम मिश्र स्वरूपात समोर आले आहेत.

सर्वेक्षणानुसार, राज्य सरकार आर्थिक परिस्थिती सांभाळण्यात ‘बऱ्यापैकी यशस्वी’ झाल्याचं मत 43 टक्के नागरिकांनी नोंदवलं आहे. 31 टक्के नागरिकांनी सरकारची कामगिरी ‘सरासरी’ असल्याचं म्हटलं आहे.  फक्त 11 टक्के लोकांनी सरकारला ‘अत्यंत यशस्वी’ अशी सर्वोच्च श्रेणी दिली आहे. तर या सर्वेक्षणात 9 टक्के लोकांनी सरकारला ‘अपयशी’ ठरवलं असून 6 टक्के नागरिकांनी या सरकारच्या आर्थिक परिस्थितीवर थेट ‘पूर्ण अपयशी’ असं मत दिलं आहे. 

Maharashtra Government Survey: राज्याची आर्थिक घडी बसवण्यात सरकार किती यशस्वी? जनतेने दिला कौल

 

झी 24 तास आणि JDS चा महासर्व्हे

14 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान हा सर्व्हे करण्यात आला आहे. यामध्ये एकूण 89 हजार 812 जणांना समाविष्ट करण्यात आलं. या सर्वेक्षणात, सामाजिक-राजकीय संशोधन व डेटा विश्लेषणातील दोन पद्धतींचा वापर करण्यात आला आहे. 

पहिल्या पद्धतीत प्रत्यक्ष भेटी व घरघर फिरून सर्व्हे करण्यात आला आहे. यामध्ये 4 महानगरं, 24 जिल्हे, 37 नगरपरिषदा व 48 तालुके समाविष्ट होते. यादरम्यान 22 हजार 654 जणांच्या वैयक्तिक मुलाखती घेण्यात आल्या.

तर दुसरा टेलिया मोबाईल-आधारित AI व्हॉइस सर्व्हे आहे.  मोबाईलद्वारे अत्याधुनिक, संवादात्मक AI-आधारित व्हॉइस सर्व्हेमध्ये 67 हजार 158 जणांना समाविष्ट करण्यात आलं. 

AI टेलिफोनिक व्हॉइस सर्व्हे आणि प्रत्यक्ष संवादामुळे महाराष्ट्रातील जनमताचा कानोसा घेणारे हे सर्वेक्षण आगळे वेगळे ठरले आहे.

महाराष्ट्रातील सर्व्हेची भौगोलिक व्याप्ती: कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्र या विविध विभागांचे संतुलित प्रतिनिधित्व मिळावे यासाठी खालील 4 महानगरं, 24 जिल्हे, 37 नगरपरिषदा व 48 तालुके येथे सर्व्हे करण्यात आला.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp